AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धरण परिसरात फिरायला आले होते, धरणात पोहचण्याचा मोह आवरला नाही, मग…

कोल्हापूरहून सहा मित्र पिकनिकसाठी पुण्यातील मावळमध्ये आले होते. काल सायंकाळी सर्वजण टाटा धरणावर पोहायला गेले. मात्र यानंतर तरुणाची ही पिकनिक शेवटीच ठरली.

धरण परिसरात फिरायला आले होते, धरणात पोहचण्याचा मोह आवरला नाही, मग...
टाटा धरणात तरुण बुडालाImage Credit source: TV9
| Updated on: Apr 06, 2023 | 6:52 PM
Share

मावळ, पुणे / रणजित जाधव : कोल्हापूरहून मावळमध्ये पर्यटनासाठी आलेला एक तरुण अंदर मावळ येथील टाटा धरणात बुडाल्याची घटना काल सायंकाळी घडली. अरुण धनंजय माने असे बुडालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. मित्रांसोबत धरणावर पोहायला गेला असता ही दुर्दैवी घटना घडली. मयत तरुणाचा शोध सुरु आहे. अद्याप मृतदेह हाती लागला नाही. पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने अरुण माने हा पाण्यात बुडाला. घटनास्थळी वडगाव मावळ आपदा टीम आणि वन्यजीव रक्षक मावळ रेस्क्यू टीमसह वडगाव मावळ पोलीस दाखल झाले.

कोल्हापूरहून सर्व मित्र मावळमध्ये पर्यटनासाठी आले होते

कोल्हापूरहून 5 ते 6 पर्यटक तरुण अंदर मावळ वडेश्वर शिंदे घाटेवाडी येथे पर्यटनसाठी आले होते. काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सर्व मित्र पोहण्यासाठी टाटा धरणावर गेले. धरणात उतरल्यानंतर अरुण माने हा पोहत खोल पाण्यात गेला. मात्र पुन्हा किनाऱ्याकडे येत असताना त्याची दमछाक झाली आणि तो पाण्यात बुडाला. हे सर्वजण कोल्हापूर येथे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत आहेत.

तरुणाचा शोध सुरु

घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. यानंतर तरुणाचा शोध घेण्यासाठी आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांना पाचारण करण्यात आले. काल सायंकाळपासून तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही.

भोरमधील भाटघर धरणात तरुणी बुडाली

मित्रासोबत भोर तालुक्यातील भाटघर धरणावर फिरायला आलेली तरुणी बुडाल्याची घटना काल उघडकीस आली. सदर तरुणी साताऱ्यातील खटाव तालुक्यातील रहिवासी आहे. धरणाच्या काठावर बसली असता पाय घसरुन पाण्यात पडली. मात्र तरुणीचा नक्की अपघात झाला की घातपात आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.