AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचे बंद वाहन रस्त्यावर पडून आहे का? उचलून घ्या, अन्यथा होणार अशी कारवाई

Pune News : रस्त्यांवर अनेक दिवसांपासून बेवारस पडलेली वाहने किंवा रस्त्यावर अडथळा ठरणारे वाहन उचलून घ्यावे लागणार आहे. ही वाहने न उचलल्यास दंडासोबत मोठी कारवाई होणार आहे. पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतलाय.

तुमचे बंद वाहन रस्त्यावर पडून आहे का? उचलून घ्या, अन्यथा होणार अशी कारवाई
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 17, 2023 | 2:52 PM
Share

पुणे | 17 जुलै 2023 : अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर बंद पडलेली वाहने किंवा बेवारस पडलेले वाहन एक मोठी समस्या असते. ही वाहने वाहतुकीसाठी नेहमी अडथळा ठरत असतात. परंतु वाहन मालक त्याकडे लक्ष देत नाही. आपल्या वाहनास हक्काची जागा मिळाली, असा समज त्यांचा झालेला असतो. परंतु आता रस्त्यावर पडलेल्या वाहनांविरोधात कारवाई होणार आहे. पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

काय घेतला निर्णय

पुणे शहरातील रस्त्यावरील बंद वाहने सात दिवसांच्या आत हटवा, असे निर्देश पुणे महानगरपालिकेने दिले आहे. ही वाहने न हटवल्यास महापालिका प्रशासनाकडून २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. पुणे शहराच्या अनेक मध्यवर्ती भागात त्याचप्रमाणे उपनगरांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी बेवारस वाहने आहेत. अनेक महिने ही वाहने पडून आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. बंद असलेल्या वाहनांच्या जवळपास नागरिकांकडून कचरा टाकला जातो. त्यामुळे शहर स्वच्छ राहत नाही तसेच दुर्गंधी पसरत आहे. यासंदर्भातील तक्रारी पुणे महानगरपालिकेकडे सातत्याने येतात.

आधी नोटीस नंतर अशी कारवाई

पुणे महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस वाहनांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. या वाहनांवर महापालिका प्रशासनाकडून नोटीस चिकटवण्यात येणार आहे. त्यानंतर सात दिवसांत ही वाहने न हटवल्यास ती जप्त केली जाणार आहेत. तसेच दंडही केला जाणार आहे. गेल्या वर्षी याच मोहिमेअंतर्गत महापालिका प्रशासनाने वर्षभरात १२०० वाहने जप्त केली होती.

ही आहे परिस्थिती

बेवारस वाहने अनेक दिवसांपासून पडलेली आहे. ही भंगार अवस्थेतील वाहने असल्यामुळे वाहन मालक लक्ष देत नाही. वर्षानुवर्ष ही वाहन एकाच ठिकाणी असल्यामुळे परिसरात झाडेझुडपे, गवत मोठ्या प्रमाणात वाढलेले असते. या परिसरात प्लास्टिक कचरा, मद्याच्या बाटल्या, माती, खडी, वाळूचे ढिगारे साचलेले असतात. त्यासंदर्भात तक्रारी मनपाकडे येत असतात. परंतु आतापर्यंत कारवाई होत नव्हती.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं