AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाहांपाठोपाठ अजित डोभाल यांचा Gen-Z ला संदेश काय? म्हणाले, स्वातंत्र्याचा अर्थ…

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी Gen-Z ला उद्देशून महत्त्वाचा संदेश दिला आहे. स्वातंत्र्याचा अर्थ मनमानी किंवा स्वैराचार नसून, देशाप्रती जबाबदारी आणि राष्ट्रनिष्ठा हेच खरे स्वातंत्र्य आहे.

अमित शाहांपाठोपाठ अजित डोभाल यांचा Gen-Z ला संदेश काय? म्हणाले, स्वातंत्र्याचा अर्थ...
Ajit Doval Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 01, 2026 | 4:52 PM
Share

जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनानंतर देशातील Gen-Z प्रकाशात आले आहेत. तरुणांच्या आंदोलनाने देशात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे या तरुणांचं कौतुकही होत आहे आणि त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीही या Gen-Zला संदेश दिला आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाहीये, असा सल्लाच अजित डोभाल यांनी दिला आहे. पुणे येथील कार्यक्रमात डोभाल बोलत होते.

पुण्यात आज अजित डोभाल यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. यावेळी डोभाल यांनी पुण्याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. हा उजाळा देत असतानाच त्यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाचा उल्लेख न करता तरुणांना संदेश दिला आहे.

आपलं सौभाग्य की…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सारखं मजबूत नेतृत्व आपल्याला मिळालं हे आपलं सौभाग्य आहे. भारत यावेळी अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही समस्यांचा सामना करत आहे. देश वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे विरोधी शक्ती देशाच्या प्रगतीमुळे त्रस्त आहेत. अशावेळी देशातील नागरिकांनी सर्वात आधी देशाच्या हिताबाबत विचार केला पाहिजे, असं अजित डोभाल यांनी म्हटलं आहे.

मनमानी करू नका

आजच्या तरुणांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला पाहिजे. काही लोकांना स्वातंत्र्याचा अर्थ मनमानी वाटतो. किंवा काहीही करणं वाटतं. असा विचार करणं हे अत्यंत चुकीचं आहे, असं सांगतानाच जो मार्ग देशाच्या विरोधात जातो, त्या मार्गाने जाऊच नव्हे. भारताला शक्तीशाली बनवणं हेच आपलं ध्येय आणि कर्तव्य असलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.

राष्ट्रभाव जागला पाहिजे

आजच्या युवकांनी विचार करण्याची गरज आहे, लोकमान्य टिळकांची राष्ट्रनिर्माणाची काय संकल्पना होती आणि त्यासाठी त्यांनी काय केलं हे जाणून घेतलं पाहिजे. आज टिळक असते तर भारताला सशक्त आणि विकसित बनवणं हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे टिळक म्हटले असते, एवढं स्वतंत्र्य मिळवले आहे. राष्ट्रभाव जागला पाहिजे, असं ते म्हणाले.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था