AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baramati Ajit Pawar : ‘…त्याचा सर्वाधिक फटका गरिबांना’, बारामतीतल्या कार्यक्रमात जातीय वादावर काय म्हणाले अजित पवार?

सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे. जातीय सलोखा राखावा. सण उत्सवातून एकोपा राहावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. कोऱ्हाळे खुर्द (Korhale Khurd) येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

Baramati Ajit Pawar : ‘...त्याचा सर्वाधिक फटका गरिबांना’, बारामतीतल्या कार्यक्रमात जातीय वादावर काय म्हणाले अजित पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवारImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 17, 2022 | 2:47 PM
Share

बारामती : सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे. जातीय सलोखा राखावा. सण उत्सवातून एकोपा राहावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. कोऱ्हाळे खुर्द (Korhale Khurd) येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास दत्ता भरणे (Dattatray Bharne) येणार होते. पण सोलापूरचे पालकमंत्री म्हणून त्यांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी जावे लागले, असे ते यावेळी म्हणाले. तर कार्यक्रमपत्रिकेत अजित पवारांनी यावेळी चूक दाखवून दिली. यावेळी अजित पवार म्हणाले, की गावांचा विकास व्हावा, चांगल्या सुविधा मिळाव्यात हा आमचा प्रयत्न आहे. मात्र विकासकामांसाठी निधी आणताना मोठी कसरत करावी लागते. जेवढ्या सोयी करता येतील त्या करायचा आमचा प्रयत्न आहे. मी येणार म्हणून रस्ता केला. त्याचे काम नीट पूर्ण करा. कामाचा दर्जा नीट राखा. अधिकाऱ्यांना सूचना करा. तुम्ही शासनाचा पगार घेता. त्यामुळे कार्यकर्त्यांपेक्षा अधिकाऱ्यांनाच मी जबाबदार मानतो, असे ते म्हणाले.

‘कधीतरी बोलवा तमाशाला’

यावर्षी पाऊसकाळ चांगला होण्याचा अंदाज आहे. तर यात्रा उत्सव, उरुस सुरू आहेत. कुस्त्यांचे फड, तमाशाचे फड रंगत आहेत. इथे असतो का तमाशा, असे विचारत कधीतरी बोलवा तमाशाला, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. आजोबा म्हणायचे, अजित चल तमाशाला, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

‘राज्यात वीजेची टंचाई, काटकसरीने वापर करा’

वीजेची सध्या चणचण भासत आहे. काय होणार ही चिंता आहे. कोळश्याची टंचाई निर्माण झाली आहे. परदेशातून कोळसा आयात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे वीजेचा भारही वाढला आहे. मागणी वाढली आहे. बाहेरील राज्यातून वीज घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी आवश्यक पाणी शिल्लक ठेवून उर्वरित पाणी वीजेसाठी वापरणार आहोत. दुसरीकडे, तुम्ही वापरत असलेल्या वीजेचे बील भरले पाहिजे, असे ते म्हणाले. माळेगावमध्ये वीजेचे माळ सुरू होती. हायमास्टही चालू होता. पण आता हायमास्टला बंदी घातली आहे. राज्यात काही ठिकाणी दिवसाही दिवे चालू ठेवतात. त्याचे पऱिणाम भोगावे लागतात, असे ते म्हणाले.

‘प्रिपेड पद्धतीने देणार वीज’

शेतकऱ्यांना अडचणींतून बाहेर काढण्यासाठी जे काही करता येईल, ते करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. वीजेच्या बाबतीतही काही निर्णय घेतले आहेत. आता वीज प्रिपेड पद्धतीने देणार आहे. गरज असेल तशी वीज वापरा. आता आकडा बंद. आकडा टाकून टाकून आमची वाट लागली. वीजबिल न भरणारांचा भार हा नियमीत बील भरणारांवर येतो.

‘जातीधर्मांत तेढ निर्माण करू नका’

सध्या राज्यात देशात काहीजण जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला बळी पडू नका. जातीय वादंगाचा सर्वाधिक फटका हा गरिबांना बसतो, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणुका, बारामती तसेत राज्यातील विकासकामे, कोरोनाकाळ, महाविकास आघाडी अशा विविध विषयांवर मते व्यक्त केली.

…अन् अजितदादा म्हणाले, मोबाइल फिरवून सेल्फी घे…

सत्कारानंतर एक कार्यकर्ता सेल्फी घेत होता. अजित पवार यावेळी म्हणाले, की मोबाइल फिरवून सेल्फी घे…

आणखी वाचा :

Raj Thackeray : 1 मे रोजी राज ठाकरे यांची तोफ औरंगाबादेत धडाडणार, पुण्यात केली घोषणा

Indapur : हर्षवर्धन पाटील हे लबाड आणि लफंगे, त्यांना जवळही येऊ देऊ नका; दत्तात्रय भरणेंची जहरी टीका

Raj Thackeray : तर दिवसांतून पाचवेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू; राज ठाकरेंचा इशारा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.