‘प्रतिभा काकी प्रचाराला आल्या, मी तर कपाळाला हात लावला’; अजित पवार यांचा टोला

| Updated on: Apr 17, 2024 | 8:31 PM

"माझा परिवार सोडून बाकीचा सर्व परिवार पायात भिंगरी लावून प्रचारात फिरत आहे. काल परवा प्रतिभा काकी प्रचाराला आल्या. मी तर कपाळाला हात लावला", असं अजित पवार म्हणाले. ते वकिलांच्या मेळाव्यात बोलत होते.

प्रतिभा काकी प्रचाराला आल्या, मी तर कपाळाला हात लावला; अजित पवार यांचा टोला
अजित पवार, शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचा फोटो
Follow us on

बारामतील पवार कुटुंबातील दोन महिला या समोरासमोर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत. तर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटाकडून खासदार सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत. दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्याकडून सभांमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. अजित पवार यांनी टीका करताना आज त्यांच्या काकू आणि शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यादेखील नावाचा उल्लेख केला. ते वकिलांच्या मेळाव्यात बोलत होते. “आरोग्य बाबतीत अनेक हॉस्पिटल उभी करीत आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या 4 वेळा मुख्यमंत्री काळात झालेले निर्णय, आणि मी 6 वेळा उपमुख्यमंत्री असताना झालेले निर्णय, मी घेतलेले निर्णयात विकासकामे नक्कीच जास्त आहेत”, असा टोला अजित पवारांनी लगावला.

“डॉक्टर पेक्षा वकील गुंतवणूक जास्त करतात. मी उपमुख्यमंत्री नसताना बारामतीत जागेचे भाव खाली आले होते. 1990 च्या आधीची बारामती आठवून पाहा. खऱ्या अर्थाने 1990 नंतर बारामती सुधारत गेली. बारामतीची बाजारपेठ 12 महिने चालू आहे. काही लोक माझ्या समोरच्या बाजूला प्रचार करतात. ते मला खटकतं. लोकसभा राहुद्या, विधानसभेला बघू, असं काहीजण म्हणतात. पण माझे बारामतीकर मला ढिगान मते देऊन निवडून देतील. माझा परिवार सोडून बाकीचा सर्व परिवार पायात भिंगरी लावून प्रचारात फिरत आहे. काल परवा प्रतिभा काकी प्रचाराला आल्या. मी तर कपाळाला हात लावला”, असं अजित पवार म्हणाले.

‘संविधान कुणीही बदलू शकत नाही’

“चंद्र, सूर्य असेपर्यंत संविधान कुणीही बदलू शकत नाही. मी 10 वर्षांपासून सांगतोय. आपली रेल्वे लाईन बारामती ते फलटणला जोडा. मी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो आणि ते म्हणाले काम मार्गी लावले. माझी मोदी यांच्याशी ओळख झाली म्हणून हे कामे होत आहे”, असा दावा अजित पवारांनी केला.

“मला बारामतीकरांनी नाव दिलं. लोकसभेला तिकडे मत आणि विधानसभेला इकडे मत ही बारामतीकारांची मानसिकता होती. त्यामुळे हा पत्ता खेळला पाहिजे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील यांच्याशी मी मिळतंजुळतं घेतलं आहे. विकासकामे करायची असेल तर या बाबी कराव्या लागतात”, असं अजित पवार म्हणाले.