AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asim Sarode : संविधानात काही बाबींची स्पष्टता नाही, त्याचाच फायदा घेण्याची प्रवृत्ती वाढली; राजकीय परिस्थितीवर असीम सरोदेंचं स्पष्ट मत

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, तरी प्रश्न विचारता येणार. मंत्रिमंडळाचा विस्तार करणे बेकायदेशीर नाही, मात्र ज्यांना नोटीस दिली आहे, त्यांना मंत्रिमंडळात स्थान असू नये, असे असीम सरोदे यांचे मत आहे.

Asim Sarode : संविधानात काही बाबींची स्पष्टता नाही, त्याचाच फायदा घेण्याची प्रवृत्ती वाढली; राजकीय परिस्थितीवर असीम सरोदेंचं स्पष्ट मत
राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना असीम सरोदेImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 14, 2022 | 9:21 PM
Share

पुणे : संविधानाचे (Constitution) मुद्दे आहेत तसे नैतिकतेचेदेखील आहेत. संविधानात काही गोष्टींबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे ते फायदा घेत आहेत, असे मत अॅड. असीम सरोदे (Asim Sarode) यांनी व्यक्त केले आहे. राज्यात शिवसेनेतून 40 आमदारानी बंड करत भाजपाच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या बंडाचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत शिवसेनेतील 40 आणि अपक्ष 10 अशा सर्व आमदारांना घेऊन शिंदे यांनी भाजपाला पाठिंबा दिला आणि राज्यात सत्ता काबीज केली. घडलेल्या या सर्व घडामोडी घटनात्मक नाहीत. त्यामुळे हे सरकार किती दिवस टिकणार, याविषयी विविध अंदाज वर्तवले जात आहेत. याविषयी अॅड. असीम सरोदे यांनीदेखील कायद्याच्या दृष्टीकोनातून आपले मत मांडले आहे. नोटीस बजावलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात घेतले जाऊ नये, हे घटनात्मकदृष्ट्या योग्य असेल, असेही ते म्हणाले.

‘निर्णय अद्याप नाही’

सरोदे म्हणाले, की राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावणे हा त्यांचा अधिकार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, तरी प्रश्न विचारता येणार. मंत्रिमंडळाचा विस्तार करणे बेकायदेशीर नाही, मात्र ज्यांना नोटीस दिली आहे, त्यांना मंत्रिमंडळात स्थान असू नये, असे सरोदे यांचे मत आहे. या सरकारला भीती आहे. कारण काही गोष्टी या घटनात्मक नाहीत. 16 आमदारांचे निलंबन आणि यांसदर्भातील निर्णय अद्याप प्रलंबितच आहे. कोर्टाने शिवसेना पक्ष आणि शिंदे गट अशा दोघांबाबतही अद्याप निर्णय दिलेला नाही.

काय म्हणाले असीम सरोदे?

‘घटनात्मकता जपायला हवी’

कोर्टाचा निकाल कधी लागेल हे आताच सांगता येणार नाही. कदाचित सरकारचा कालावधीही पूर्ण होऊ शकतो, मात्र तसे व्हायला नको. काही गोष्टीत घटनात्मकता जपायला हवी. मात्र राज्यात सध्या सुरू असलेला कारभार घटनेला अनुसरून नाही. घटनेत काही बाबतीत स्पष्टता नाही. त्याचाच गैरफायदा सध्या घेतला जात आहे, असे मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, आपल्यासोबत 166 आमदार असून सरकार स्थिर असल्याचा दावा शिंदे गट तसेच भाजपाकडून करण्यात येत आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.