Pune Narayan Rane : उद्धव ठाकरे कधी सक्षम मुख्यमंत्री होते? नारायण राणेंचा प्रहार; राष्ट्रपती राजवटीबाबतही व्यक्त केलं मत, म्हणाले…

पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड उगवण्याचे काम करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था (Law & Order) नाही. खून होतायेत, दरोडे पडतायेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले जात नाहीत. अशा काळात राष्ट्रपती राजवट (President Rule) येणे गरजेचे आहे, असे नारायण राणे म्हणाले.

Pune Narayan Rane : उद्धव ठाकरे कधी सक्षम मुख्यमंत्री होते? नारायण राणेंचा प्रहार; राष्ट्रपती राजवटीबाबतही व्यक्त केलं मत, म्हणाले...
भाजपाच्या पत्रकार परिषदेत नारायण राणे (संपादित छायाचित्र)Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 3:28 PM

पुणे : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही. बेबंदशाही चालली आहे. जे सत्तेत आहेत तेच धिंगाणा घालत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यात सुरू असलेल्या वादावर त्यांनी आपले मत व्यक्त करत राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, की पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड उगवण्याचे काम करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था (Law & Order) नाही. खून होतायेत, दरोडे पडतायेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले जात नाहीत. अशा काळात राष्ट्रपती राजवट (President Rule) येणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. एका व्यक्तीला एक कायदा आणि दुसऱ्याला दुसरा कायदा असा प्रकार सध्या राज्यात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला मागे नेल्याचा घणाघात नारायण राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केला.

हनुमान चालिसावरून वाद

खासदार नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर जो प्रकार केला आणि त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली, त्यावर नारायण राणे म्हणाले, की या देशात लोकशाही आहे. कोणी हनुमाना चालिसा पठण करण्यासाठी येत असेल तर विरोध का. एका व्यक्तीला एक कायदा आणि दुसऱ्याला दुसरा कायदा लावला जात आहे. मुख्यमंत्र्यांचा कोणावरही अंकुश नाही. ना संजय राऊतांवर ना इतर कोणावर. संजय राऊतांचे नाव नको. माझा दिवस खराब जाईल, अशी टीका राणेंनी केली.

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे कधी सक्षम मुख्यमंत्री होते? राज्याचा मुख्यमंत्री सक्षम नाही. राज्याचे प्रश्न त्यांना माहीत नाहीत. 89 हजार कोटींची तूट आहे. या राज्याची व्यवस्था पूर्ण बिघडली आहे. महाराष्ट्राला 10 वर्ष या मुख्यमंत्र्यांनी मागे नेले आहे. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावार भाषण केले, कलानगरच्या नाक्यावर केले तसे, अशी बोचरी टीका राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

आणखी वाचा :

Ravi Rana : रावणाचा अहंकार टिकला नाही, तिथे उद्धव ठाकरेंचा काय टिकणार? आम्हाला फसवलं म्हणत रवी राणांची उद्धव ठाकरेंवर टीका

Pune Asim Sarode : हनुमान चालिसा म्हणण्यात देव नाही, तर राजकारण; पुण्यातल्या नास्तिक मेळाव्यात असीम सरोदेंची टीका

PM Modi : पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार नाहीत, पत्रिकेवर नाव नसल्याने नवा वाद

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.