AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“निवडणूक आयोगाचे निर्णय लोकांना माहिती आहे”;राष्ट्रवादीची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

आजकाल जे तोंड बंद करण्याचे काम चालले आहे ते सगळं आता लोकांच्या लक्षात येत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

निवडणूक आयोगाचे निर्णय लोकांना माहिती आहे;राष्ट्रवादीची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Feb 22, 2023 | 11:46 PM
Share

पुणेः चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रत्येक पक्षाकडून आपापलाच उमेदवार निवडून येईल अशी खात्री बाळगली जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या न्यायालयीन लढाईवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेबरोबरच भाजपवरही जोरदार हल्लाबोल चढविला जात आहे. आजच्या झालेल्या चिंचवडमध्ये झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवरही जोरदार टीका केली आहे.

यावेळी राज्य सरकारवर टीका करताना मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे हे निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

छगन भुजबळ यांनी पहाटेच्या शपथ विधीवरूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा छेडले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, पहाटेचा शपथ विधी आता तुम्ही कशाला काढता, तुमचं पुढचं काय आहे ते आता सांगा असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

वेगवेगळ्या विषयांना बगल देण्यासाठी या गोष्टी देवेंद्र फडणवीस काढत असे म्हणत त्यांनी शरद पवार यांची बाजू उचलून धरली आहे. पहाटेचा शपथ विधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली नसती असं म्हणत त्यांनी शरद पवार यांची बाजू उचलून धरली आहे.

राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी गंभीर आरोप केला आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या न्यायालयीन वादावर बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवरही गंभीर टीका केली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, आजकाल जे तोंड बंद करण्याचे काम चालले आहे ते सगळं आता लोकांच्या लक्षात येत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

आमदार छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. अदानी यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

भाजपच्या काळात देशात महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढत चालली आहे. त्याबद्दल ना भाजप बोलते आहे ना राज्य सरकार त्यावर काही बोलते आहे.

मात्र आता सर्वसामान्य माणूस एरवी बोलणार नसला तरीही मतदान करताना मात्र योग्य मतदान करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....