AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“निवडणूक आयोगाचे निर्णय लोकांना माहिती आहे”;राष्ट्रवादीची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

आजकाल जे तोंड बंद करण्याचे काम चालले आहे ते सगळं आता लोकांच्या लक्षात येत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

निवडणूक आयोगाचे निर्णय लोकांना माहिती आहे;राष्ट्रवादीची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Feb 22, 2023 | 11:46 PM
Share

पुणेः चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रत्येक पक्षाकडून आपापलाच उमेदवार निवडून येईल अशी खात्री बाळगली जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या न्यायालयीन लढाईवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेबरोबरच भाजपवरही जोरदार हल्लाबोल चढविला जात आहे. आजच्या झालेल्या चिंचवडमध्ये झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवरही जोरदार टीका केली आहे.

यावेळी राज्य सरकारवर टीका करताना मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे हे निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

छगन भुजबळ यांनी पहाटेच्या शपथ विधीवरूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा छेडले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, पहाटेचा शपथ विधी आता तुम्ही कशाला काढता, तुमचं पुढचं काय आहे ते आता सांगा असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

वेगवेगळ्या विषयांना बगल देण्यासाठी या गोष्टी देवेंद्र फडणवीस काढत असे म्हणत त्यांनी शरद पवार यांची बाजू उचलून धरली आहे. पहाटेचा शपथ विधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली नसती असं म्हणत त्यांनी शरद पवार यांची बाजू उचलून धरली आहे.

राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी गंभीर आरोप केला आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या न्यायालयीन वादावर बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवरही गंभीर टीका केली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, आजकाल जे तोंड बंद करण्याचे काम चालले आहे ते सगळं आता लोकांच्या लक्षात येत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

आमदार छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. अदानी यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

भाजपच्या काळात देशात महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढत चालली आहे. त्याबद्दल ना भाजप बोलते आहे ना राज्य सरकार त्यावर काही बोलते आहे.

मात्र आता सर्वसामान्य माणूस एरवी बोलणार नसला तरीही मतदान करताना मात्र योग्य मतदान करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर