AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात का, ते शिंदेंच्या बंडाचा बहुमताशी आकड्यांचा खेळ; घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी तुमच्या मनातल्या 5 प्रश्नांची उत्तरं सविस्तर दिली

भाजपा सत्तास्थापन करू शकते का, या सर्वांविषयी घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी सविस्तर माहिती दिली. कोणती कलमे आणि नेमके काय नियम आहेत, याचे बारकावे त्यांनी टीव्ही 9सोबत बातचित करताना सांगितले.

Eknath Shinde : फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात का, ते शिंदेंच्या बंडाचा बहुमताशी आकड्यांचा खेळ; घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी तुमच्या मनातल्या 5 प्रश्नांची उत्तरं सविस्तर दिली
कायदे तज्ज्ञ उल्हास बापट Image Credit source: tv9
| Updated on: Jun 22, 2022 | 10:38 AM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर आता भाजपातर्फे सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्यासोबत 37 आमदार असणे घटनेनुसार गरजेचे आहे. येथे तीन आमदार अधिक आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भाजपाने एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसोबत बहुमताचा आकडा गाठल्यास भाजपाला सत्तास्थापन करता येणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना राज्यपालांसमोर या सर्व आमदारांचे पत्र ठेवावे लागणार आहे. याचसंबंधी नेमकी काय प्रक्रिया आहे, भाजपा सत्तास्थापन करू शकते का, या सर्वांविषयी घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी सविस्तर माहिती दिली. कोणती कलमे आणि नेमके काय नियम आहेत, याचे बारकावे त्यांनी टीव्ही 9सोबत बातचित करताना सांगितले.

  1. बहुमत भाजपाच्या बाजूने – एकनाथ शिंदे यांच्यासोबत 37 आमदार असतील तर बहुमत त्याबाजूने (भाजपा) गेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अशा परिस्थितीत राजीनामा देणे योग्य ठरते. त्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्रीपदाबाबत बहुमत असलेल्या पक्षाला विचारणा करतात. याबाबतीत राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे अधिकार सारखेच आहेत.
  2. …तर राष्ट्रपती राजवट लावावी लागेल – सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात. राज्यपाल त्यांना बोलावू शकतात. मात्र देवेंद्र फडणवील म्हणत आले आहेत, की ते स्वत:च्या बळावर मुख्यमंत्री होतील. मात्र एकनाथ शिंदे समर्थकांसह त्यांनी सरकार बनवले तर त्यांच्याकडे दोन वर्ष राहतील. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री होण्यास नकार दिला, तर मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकतो. राष्ट्रपती राजवट लागू झाली, तर सहा महिन्यांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात.
  3. पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील – राष्ट्रपती राजवटीनंतर झालेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाला बहुमत मिळाले तर ते पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील. सरकार स्थिर राहील. घटनेनुसार सध्यातरी एकूण अशीच परिस्थिती दिसत आहे.
  4. प्रत्यक्ष हजर केल्यास… – पाठिंबा असलेल्या आमदारांचे पत्र राज्यपालांना दिल्यास सत्तास्थापन होऊ शकते. तसेच याविरोधात न्यायालयात अपीलही करता येते. तर पत्राऐवजी प्रत्यक्ष त्या आमदारांना हजर केल्यास ती प्रक्रिया जास्त सोयीची ठरते. राज्यपालांसमोर सर्व आमदारांची परेड झाली भाजपाच्या आमदारांसोबत तर सत्तास्थापन करणे सोपे होईल.
  5. आकड्यांचा खेळ आणि बहुमत – 288पैकी 144 जणांची पत्र राज्यपालांना दिली तर संख्याबळ सिद्ध होईल. नो कॉन्फिडन्स मोशन आणले गेले तर मतदानाच्या वेळी आपोआपच समजेल की कोणत्या पक्षाकडे किती लोक आहेत. त्यामुळे बहुमत मांडण्यासाठी हे दोन सरळ मार्ग आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.