AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे, मुंबईवरुन जाणाऱ्या विमानांचा तिकीट दरासंदर्भात महत्वाचा बदल, कुठे वाढ तर कुठे भरघोस कपात

Pune News : पुणे विमानतळ अद्यावत होत आहेत. या विमानतळावरुन अनेक सुविधा मिळत आहे. यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. आता नवीन अनेक शहरात पुण्यावरुन थेट जाता येणार आहे. तर अनेक ठिकाणी भाडे कमी झालेले आहे.

पुणे, मुंबईवरुन जाणाऱ्या विमानांचा तिकीट दरासंदर्भात महत्वाचा बदल, कुठे वाढ तर कुठे भरघोस कपात
| Updated on: Jul 01, 2023 | 2:20 PM
Share

पुणे : पुणे, मुंबईवरुन विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरातून अनेक ठिकाणी नवीन विमानसेवा सुरु केली जात आहे. जून महिन्यात 11 नवीन विमान सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच रिक्त असलेल्या स्लॉटमध्ये जुलै महिन्यात लवकरच विमानसेवा सुरु होणार आहे. त्याचवेळी दिल्लीवरुन पुणे येण्यासाठी विमानाच्या तिकीट शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. गो फर्स्टचे परिचालन निलंबित केल्यानंतर हा बदल झाला आहे. देशातील मुख्य दहा मार्गांवरील हवाई तिकिटांचे दर ६ जूनच्या तुलनेत २९ जून रोजी ७४ टक्के कमी झाले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि विमान वाहतूक मंत्रालयाने हवाई मार्गावरील दर कपात करण्याचे निर्देश दिले होते.

कोणत्या मार्गावर झाला बदल

दिल्ली ते पुणे मार्गावर तिकीट दरात ७० टक्के कपात झाली आहे. दिल्ली अहमदाबाद मार्गावर ७२ टक्के तर दिल्ली-श्रीनगर मार्गावर ३६ टक्के हवाई भाडे कमी झाले आहे. त्याचवेळी काही मार्गांवरील तिकिटांचे दर वाढले आहे. मुंबई ते दिल्ली मार्गावरील दर २३ टक्के वधारले आहे तर पुणे दिल्ली मार्गावरील दरात १७ टक्के वाढ झाली आहे.

का झाला बदल

विमान प्रवासाचे दर कमी करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून देण्यात आले होते. विमान प्रवाशाचे दर वाढल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत होती. तसेच भारतात विमान कंपन्यांना दर ठरवण्याचे अधिकार आहे. त्यावर नियंत्रण नाही. यामुळे सर्वच विमान कंपन्यांनी दर वाढवले होते. ते कमी करण्याचे केंद्र सरकारचे आदेश दिले, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली होती.

देशात मागणीनुसार असतात दर

भारतात विमान तिकिटांच्या दरासंदर्भात काहीच नियम नाही. मागणी वाढल्यास दर वाढतात, असे समीकरण आहे. यामुळे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन दर कपात करण्याचे सांगितले होते. त्यानंतर अनेक मार्गावरील दर कमी झाले.

Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.