AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : दारूच्या पार्टीत वाद, एकाचा गळा दाबून खून; पिंपरी चिंचवडच्या दिघी पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

दारू पिण्याच्या वादातून त्यांचे भांडण झाले. त्या भांडणातच तिघांनी मिळून दीपकचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपी खून करून फरार झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेत त्यांना अटक केली आहे.

Pune crime : दारूच्या पार्टीत वाद, एकाचा गळा दाबून खून; पिंपरी चिंचवडच्या दिघी पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
दिघी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवडImage Credit source: tv9
| Edited By: Pradeep Garad | Updated on: May 11, 2022 | 9:52 AM
Share

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी (Dighi) परिसरात दारू पार्टीत वादाचे रुपांतर खून करण्यात झाले आहे. दारू पिण्याच्या वादातून एका 45 वर्षाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन जणांनी मिळून एकाचा खून केला आणि नदीत फेकून दिला आहे. देहू फाटा ते चाकण रोडवरील इंद्रायणी नदी घाटाजवळ मित्रांसोबत दारूची पार्टी सुरू असताना क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. तो टोकाला गेला. त्यातून दीपक या व्यक्तीची मित्रांनी त्याची हत्या केली. याप्रकरणी दिघी पोलिसांनी (Dighi police) बंट्या, शिंदे मामा आणि माधव या तीन जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांना घटनास्थळाची पाहणी करून या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना अटक (Arrested) केली आहे.

तिघांना अटक

माधव अतरुषी साबळे (वय 30, मूळ रा. मु. पो. जांब अंध, ता. सेनगाव, जि. हिंगोली), सुधाकर उर्फ बंटी बबन वाघमारे (वय 30, मूळ रा. हिंगलजवाडी, जि. उस्मानाबाद), ज्ञानेश्वर पुंडलिक शिंदे (वय 56, मूळ रा. मु. पो. हाडुलकी, ता. अहमदपूर, जि. लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार गणेश कळंके यांनी सोमवारी दिघी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

गळा आवळून खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊ ते सोमवापी सकाळी नऊदरम्यान इंद्रायणी घाटाजवळ आळंदी येथे एकजण बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला पोलिसांनी उपचाराकरिता पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदन अहवालामध्ये त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिक चौकशी केली असता मृताचे नाव दीपक असल्याचे समजते. दारू पिण्याच्या वादातून त्यांचे भांडण झाले. त्या भांडणातच तिघांनी मिळून दीपकचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपी खून करून फरार झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. अधिक तपास दिघी पोलीस करीत आहेत.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?