AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : मला निवडून यायला कोणतीही निशाणी लागत नाही, पुण्यात एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लावला जाणार नाही. राज्याला कुठेही पैसा कमी पडू देणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आणायला पाहिजे होते, ते आम्ही केले. मग विश्वासघात कुणी केला, आम्ही केला का, हे जनता ठरवेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde : मला निवडून यायला कोणतीही निशाणी लागत नाही, पुण्यात एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
एकनाथ शिंदेImage Credit source: Twitter
| Updated on: Aug 02, 2022 | 6:45 PM
Share

पुणे : भेटायला माझ्याकडेच वेळ होता. मात्र मला वाटत नाही बाकी कुणाकडे भेटायला वेळ होता, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. ते पुण्यात बोलत होते. शिवसेनेतील बंडखोरांच्या मतदारसंघात सध्या एकनाथ शिंदेंचे दौरे सुरू आहेत. आज ते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या मतदारसंघात होते. यावेळी त्यांनी बंडखोरीची कारणे सांगत पुन्हा एकदा ठाकरेंवर टीका केली. मला जेवढे जेवढे शक्य होते, ती मदत मी करत होतो. आमच्याकडे मंत्री पद असताना आम्ही पायउतार झालो. मला निवडून यायला कुठलीही निशाणी लागत नाही, एवढे काम मी माझ्या मतदारसंघात केले आहे, असा दावादेखील यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला. असेच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहिलो असतो, तर यातील एकही आमदार निवडून आला नसता, असे वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.

‘कुणी विचारले नाही’

उद्धव ठाकरे तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर त्यांनी यावेळी टीका केली. शिवसैनिकांना या अडीच वर्षात काय मिळाले, तडीपारी कारवाई करण्यात आली. अडीच वर्षात आम्हाला कुणी विचारले नाही. सामान्य शिवसैनिकांची एक भावना होती, काँग्रेस-राष्ट्रवादीशी फारकत करण्याची मात्र आम्हाल उघड्या डोळ्यांनी हे पाहत बसावे लागत होते. नगरपंचायतीच्या निवडणुकीत सेना चार नंबरवर फेकली गेली. मात्र सेना भाजपाच सरकार आले असते, तर आज काँग्रेस-राष्ट्रवादी कुठे राहिली असती, औषधालाही उरली नसती, असा टोला त्यांनी लगावला.

‘बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी भूमिका’

थोडे जरी मागे पुढे झाले असते तर आमचा कार्यक्रमच झाला असता, असे सांगत काही लोकांना वाटले होते या लोकांनी राजकीय आत्महत्या केली आहे. दीपक केसरकर नावाचा संत माणूस भेटला. अगोदर तो माणूस अडगळीत होता. तुम्ही तो शोधून काढला. आम्ही गद्दार बंडखोर असतो तर तुम्ही एवढ्या उन्हात आला असता का, असा सवाल त्यांनी केला. आम्ही घेतलेली भूमिका बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी आहे, असे शिंदे म्हणाले.

‘कुठेही पैसा कमी पडू देणार नाही’

ज्या शिवसैनिकांनी अडीच वर्षे त्रास भोगला आहे, एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लावला जाणार नाही. राज्याला कुठेही पैसा कमी पडू देणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आणायला पाहिजे होते, ते आम्ही केले. मग विश्वासघात कुणी केला, आम्ही केला का, हे जनता ठरवेल, असे शिंदे म्हणाले.

घोषणांचा पाऊस

गुंजवणीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 50 कोटी दिले जाणार, उरुळी पाणी पुरवठा योजनेसाठी 25 कोटी रुपये दिले जाणार, दिव्यात बाजार समितीसाठी ज्या अडचणी असतील त्या दूर केल्या जातील, कुठलाही प्रकल्प तुमच्या संमत्तीने घेतला जाईल, विमानतळ हे दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आमचे सरकार आल्यावर ते थांबले आहे. एकनाथ शिंदे तुमच्या हक्काचा माणूस आहे, असे यावेळी शिंदेंनी म्हटले आहे.

Follow Us
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला.
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख....
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख.....
ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी पॅरामिलिटरी फोर्स म्हणत राऊतांचे.....
ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी पॅरामिलिटरी फोर्स म्हणत राऊतांचे......
राष्ट्रवादीतून विधान परिषदेत नेमकं कोण जाणार? राष्ट्रवादीच्या बैठकीनंत
राष्ट्रवादीतून विधान परिषदेत नेमकं कोण जाणार? राष्ट्रवादीच्या बैठकीनंत.
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात.
विझलो आज जरी मी... भाजपकडून विश्वासू नेत्याचा पत्ता कट
विझलो आज जरी मी... भाजपकडून विश्वासू नेत्याचा पत्ता कट.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान.
बच्चू कडूंच्या विधान परिषद प्रवेशावर अट; शिंदे गटात विलिनीकरणाचा पेच
बच्चू कडूंच्या विधान परिषद प्रवेशावर अट; शिंदे गटात विलिनीकरणाचा पेच.
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.