AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला केसरीतील मल्लांना मोबाईल टार्च घेऊन गाठावे लागले स्पर्धेचे ठिकाणी, रात्र काढली अंधारात

कोरोनाच्या काळात जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जिल्हा प्रशासनाने कोरोना सेंटर सुरु केलं होतं. त्या सेंटरचे विजेचे बिल हे सहा ते सात लाख रुपये झाले आहे. ते लाईट बिल न भरल्यामुळे या ठिकाणी महावितरणने संपूर्ण जिल्हा क्रीडा संकुलाची वीज कनेक्शन तोडले. त्यामुळे रात्र अंधारात काढावी लागली.

महिला केसरीतील मल्लांना मोबाईल टार्च घेऊन गाठावे लागले स्पर्धेचे ठिकाणी, रात्र काढली अंधारात
सांगलीत दाखल झालेल्या महिला कुस्तीपटू
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 24, 2023 | 9:11 AM
Share

सांगली : महाराष्ट्रात पुरुषांप्रमाणे प्रथमच महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा (Maharashtra kesri kusti spardha) घेतली जात आहे. २३ मार्चपासून ही स्पर्धा सांगलीत सुरु झाली आहे. सुरु होण्यापूर्वीपासून ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण पुणे आणि सांगली अशा दोन ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. दोन्ही संयोजकांनी आपलीच स्पर्धा खरी असल्याचा दावा केला आहे. हा वाद सुरु असताना सांगलीत स्पर्धा सुरु झाली आहे. परंतु ढिसाळ नियोजनाचा फटका महिला कुस्तीपटूंना बसला आहे. विद्युत पुरवठा खंडीत असल्याने मुलींना रात्र अंधारात काढावी लागली.

नियोजन कोलमडले

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत पार पडत आहेत आणि या स्पर्धांसाठी राज्यातील जवळपास 400 अधिक महिला कुस्तीगिर दाखल झाल्या आहेत. मात्र कुस्ती स्पर्धांच्या ठिकाणी अत्यंत ढिसाळ नियोजन पाहायला मिळाले आहे. ज्या क्रीडा संकुलाच्या आवारामध्ये कुस्ती स्पर्धा होत आहेत, त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट चालू नाही. यामुळे अंधारातून वाट काढत महिला कुस्तीपटूंना बाहेर पडावे लागत होतं. याशिवाय या महिला कुस्तीपटूंचे जेवणाची सोय करण्यात आली होती,त्या ठिकाणी ही अत्यंत ढिसाळ अशा पद्धतीचे नियोजन पाहायला मिळालं.

वीज बिल थकले, पुरवठा खंडीत

कोरोनाच्या काळात जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जिल्हा प्रशासनाने कोरोना सेंटर सुरु केलं होतं. त्या सेंटरचे विजेचे बिल हे सहा ते सात लाख रुपये झाले आहे. ते लाईट बिल न भरल्यामुळे या ठिकाणी महावितरणने संपूर्ण जिल्हा क्रीडा संकुलाची वीज कनेक्शन तोडले. यामुळे गेली सहा सात महिने या परिसरात संपूर्ण अंधार आहे. सरकारने महावितरणचे सहा ते सात लाख रुपये थकीत बील न भरल्यामुळे गुरुवारी रात्री महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी आलेल्या महाराष्ट्रातील सर्व महिला खेळाडूंना त्रास सोसावा लागला. या ठिकाणी रस्त्यावर लाईटची सोयच नसल्याने हातात मोबाईल टॉर्च लाऊन महिला मल्लांना स्पर्धेचे ठिकाण गाठण्याची वेळ आली आहे.

जेवणासाठी रांगा

क्रीडा संकुलातील लहान मेसमध्ये महिला कुस्तीगिरसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे रांगेने ताटकळत ठेवून या मुलींना आत सोडण्यात येत होतं. आसन व्यवस्था नसल्याने महिला कुस्तीपट्टूना खाली बसून जेवण करावे लागेल. पिण्याची पाण्याची व्यवस्था देखील नीट नव्हती. जेवण झाल्या नंतर हात धुण्यासाठी देखील कुस्तीगीर महिलांना पाण्याची व्यवस्था नव्हती.तर महिलांची राहण्याची व्यवस्था देखील नीट नसल्याच्या तक्रार करण्यात येत होत्या.

Follow Us
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...