AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Haribhau Rathod : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करणारी भाजपा नंबर एकची भ्रष्टवादी पार्टी! आपच्या हरिभाऊ राठोडांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, ते सामान्य जनतेला आवडलेले नाही. त्यांना बदल हवा आहे. त्यामुळे अनेकजण आपकडे आशेने पाहत आहेत, असे हरिभाऊ राठोड म्हणाले.

Haribhau Rathod : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करणारी भाजपा नंबर एकची भ्रष्टवादी पार्टी! आपच्या हरिभाऊ राठोडांचा हल्लाबोल
भाजपावर टीका करताना हरिभाऊ राठोडImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Aug 30, 2022 | 4:39 PM
Share

पुणे : भारतीय जनता पार्टी (BJP) ही देशातली नंबर एक भ्रष्टाचारी पार्टी आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा सर्रासपणे गैरवापर भाजपा करत आहे. पंजाब आणि महाराष्ट्रात जे केले तेच दिल्लीत करण्यासाठी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप आपचे नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. देशातले एकूण वातावरण पाहता आम आदमी पार्टीची गरज आहे. आपच्या रुपाने एक सक्षम पर्याय मिळाला आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी जनतेची नस पकडली आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि पंजाब पॅटर्न आणला आहे. त्यामुळेच आम्ही मागील आठवड्यात त्यांची भेट घेत पक्षात प्रवेश केला आहे. आम्ही ओबीसीसाठी काम करतो. ओबीसींच्या विविध प्रश्नांवर केजरीवाल यांच्याशी आमची चर्चा झाली, असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.

‘आल्या आल्या गोंधळ घालण्यास सुरुवात’

आधीच्या म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने गोंधळ घातला. नव्या सरकारने तर आल्या आल्या गोंधळ घालत महाविकास आघाडीला मागे टाकले आहे. मुंबई महापालिकेची वॉर्ड रचना आणि आरक्षणावरून एवढा गोंधळ घातला आहे, की उमेदवाराला कळायला मार्ग नाही, माझा वॉर्ड महिलेसाठी आहे की पुरुषासाठी. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. विधिमंडळात देवेंद्र फडणवीसांनी याविषयी खोटे सांगितले, असा आरोप राठोड यांनी केला आहे.

‘सामान्य जनतेला आवडलेले नाही’

एकीकडे आम आदमी पार्टीची घोडदौड सुरू असताना 20 कोटींची ऑफर दिली जात आहे. महाराष्ट्रात तर 50 खोक्यांची चर्चा आहे. महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, ते सामान्य जनतेला आवडलेले नाही. त्यांना बदल हवा आहे. त्यामुळे अनेकजण आपकडे आशेने पाहत आहेत, असे ते म्हणाले.

काय म्हणाले हरिभाऊ राठोड?

‘केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर’

देशात केंद्रीय यंत्रणांचा सर्रास वापर सुरू आहे. भाजपाचा एक नेता म्हणतो, राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्ष लागणारच नाही. म्हणजे कोर्ट काय निर्णय घेणार आहे, कोणाला अटक होणार आहे, हे यांना आधीच माहीत असते. ईडी, सीबीआयची कार्यालये कोण चालवते, तर ते भाजपा चालवतात, अशी टीका हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....