AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाद ठरले कारण, पत्नीची क्रूरपणे केली हत्या, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे येथील फुरसुंगी गावातील साई पॅराडाईज सोसायटीत पत्नीची पतीने हत्या केली. त्यानंतर स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांमधील वादानंतर हा प्रकार घडला.

वाद ठरले कारण, पत्नीची क्रूरपणे केली हत्या, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
| Updated on: Feb 17, 2023 | 1:16 PM
Share

पुणे : पती अन् पत्नीचा चार वर्षांपासून संसार सुरु होता. नगर जिल्ह्यातून येऊन पुणे शहरातील फुरसंगीमध्ये (Pune Crime News) राहत होते. दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रुपातंर पत्नीच्या खून करण्यापर्यंत गेले. त्यानंतर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पतीवर खुनाचा गु्न्हा (Murder)दाखल झाला आहे. तसेच आत्महत्येच्या प्रयत्नामुळे पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. अक्षय व स्वाती असे या दाम्पत्याचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

अक्षय जाधव (वय २५) व स्वाती जाधव (वय २२ ) यांचा ४ वर्षांपूर्वी विवाह झाला होता.फुरसुंगी गावातील साई पॅराडाईज सोसायटीत ते राहत होते. त्यांचा भाड्याने गाड्या देण्याचा व्यवसाय होता. बुधवारी पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादानंतर संतापलेल्या अक्षय याने स्वातीचा गळा दाबून व डोके आपटून खून केला.

त्यानंतर त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी हा प्रकार झाल्यानंतर अक्षय अत्यवस्थ होता. त्यामुळे गुरुवारी सकाळी जाधव यांचे घर उघडले नाही. शेजाऱ्यांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. पोलिसांना घटनास्थळी येऊन दार तोडले. त्यानंतर घरात अक्षय अत्यवस्थ असल्याचा आढळून आला. तसेच स्वाती मृत झाली होती. आता अक्षय याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

पोलिसात तक्रार

याप्रकरणी स्वातीचे वडिल विनायक मारुती थोरात (वय ३९, रा. साईनगर, अहमदनगर) यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात अक्षय जाधव याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्वातीचा खून करण्यामागचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. अक्षयची प्रकृती बरी झाल्यावर त्याचा जबाब घेण्यात येणार आहे. त्यातून खुनाचे कारण समोर येण्याची शक्यता आहे.

लोक का करता आत्महत्या

  • डिप्रेशन किंवा नैराश्य
  • मानसिक स्थितीत चढ-उतार
  • सतत चिंता किंवा अस्वस्थता
  • ज्या गोष्टीत आनंद वाटत होता, आता त्या गोष्टीत रस नसणं
  • सतत मनात नकारात्मक विचार
  • भविष्याबद्दल निगेटिव्ह कल्पना

आकडे काय सांगतात?

आत्महत्या प्रतिबंधक धोरण तयार करण्यात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय तज्ञांव्यतिरिक्त मानसोपचार तज्ज्ञांचाही मोठा वाटा आहे. डॉ.सत्यकांत त्रिवेदी म्हणतात की, एका संशोधनानुसार, भारतात एकीकडे आत्महत्येच्या घटना वाढत आहेत, तर दुसरीकडे त्याच वेळेस इतर 200 लोक आत्महत्येच्या विचारात असतात. याच ट्रान्स मध्ये असताना त्या वेळी 15 जणांनी प्रयत्न केले आहेत. म्हणजेच, आत्महत्येची माहिती त्यांना थेट प्रेरणा देत आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.