AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कही अमृत, तो कहीं… हवामान खात्याच्या तज्ज्ञांची शायरी, नेमकं काय सूचवायचंय?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अचानक झालेल्या या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

कही अमृत, तो कहीं... हवामान खात्याच्या तज्ज्ञांची शायरी, नेमकं काय सूचवायचंय?
rain in maharashtraImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 17, 2023 | 11:26 AM
Share

पुणे : राज्यात कालही अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं थैमान घातलं. विजांचा कडकडाट, वादळीवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच भंबेरी उडाली. पावसामुळे राज्यातील अनेक भागात काहीवेळासाठी बत्ती गुल झाली होती. तर घरी पोहोचणाऱ्या चाकरमान्यांची पावसामुळे चांगलीच दैना झाली. अवकाळीचा तडाखा गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. पण कालपासून तो मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही सक्रीय झाला आहे. हवामाना खात्याचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसणार असल्याचा इशारा दिला आहे. तर या अवकाळी पावसामुळे कसं नुकसान झालं… याची माहिती त्यांनी एका शायरीतून व्यक्त केली आहे.

गेल्या 24 तासात अनेक ठिकाणी गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीटही झाली, त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील 2 ते 3 दिवस हवामानातील गंभीर इशारे, काळजी घेण्याचा आणि आयएमडीच्या अपडेट्सकडे लक्ष देण्याचा सल्ला आहे, असं के. एस. होसाळीकर यांनी म्हटलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे किती नुकसान झालं याची माहिती त्यांनी शायरीतून व्यक्त केली आहे.

होसाळीकरांची शायरी

कहीं अमृत, तो कहीं …

बादलोंने उपर अंबरको दुल्हनसा सजा दिया, और मेरे शहर में बारीश की चार बुँदे गिरी, पर दुर कही गांव में उसका दिल शायद तेज़ धड़का, आँखों के समंदर में, फिर से पुरा खेत डुब गया |

शेतकरी धास्तावला

दरम्यान, उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वातावरणामध्ये होत असलेल्या बदलाने शेतकरी धास्तावला आहेत. तर शेतात हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतात असलेल्या ज्वारी पिकाला मोठा फटाका बसला असून या वातावरणाच्या बदलाचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे.

पिकांची हानी होण्याची भीती

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, बुलढाणा, चिखलीसह अनेक तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झालाय. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या गहू, हरभरा, मका वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडू लागली आहे. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच आहे. खामगाव शहर आणि परिसरात तर 1.4 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीने केली आहे. गेल्या 3 दिवसांपासून हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरणाने किंचितच सूर्यदर्शन होत आहे.

सतत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. सध्या गहू, हरभरा तयार झाला असून तो शेतकऱ्यांच्या घरात येणे बाकी आहे. या अवकाळी पावसाने या पिकांची हानी होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होवू लागली आहे. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकरी चिंतातूर झाले आहे..

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.