AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जातीय सलोखा राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन..

अमरावतीमध्ये पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

जातीय सलोखा राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन..
अजित पवार
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 1:32 PM
Share

बारामती – त्रिपुरा येथील घटनेनंतर नांदेड, मालेगाव आणि अमरावतीत जातीय दंगली उसळल्या.. काही समाजकंटकांनी याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला.. काही गालबोट लावण्याचा प्रयत्न केला.. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की, आपण सर्वांनी आपली परंपरा कायम ठेवात, जातीय सलोखा कायम राखावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत एका कार्यक्रमावेळी बोलताना केलं आहे.

नेमक प्रकरण काय ? त्रिपुरामध्ये मशीद जाळण्यात आल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे देशभर याचे पडसाद उमटले. महाराष्ट्रात देखील तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.  अमरावतीतील राजकमल चौक, नमुना गल्ली,ऑटो गल्ली, इतवारा परिसर, पठाण चौक, सरोज चौक, सराफा मार्केट, कपडा मार्केट आणि जव्हारद्वारा या परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्या. सद्यस्थितीला अमरावतीत तणावपूर्ण शांतात आहे.

अमरावतीमध्ये पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्रं येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्रं आलेले दिसल्यास त्यांना अटक केली जाणार आहे. इंटरनेटची सेवाही बंद करण्यात आली आहे.

पोलीस महासंचालकांचे नागरिकांना शांततेचे आवाहन दरम्यान महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडेय यांच्याकडून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, या सर्व अफवा आहेत, नागरिकांनी अफवेंना बळी पडू नये. अशा घटनांमध्ये सहभागी लोकांचा फायदा होत नाही, उलट त्यांचे भविष्ट धोक्यात येते. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

गडचिरोलीमध्ये 26 नक्षलवादी ठार; वळसे पाटलांनी केले पोलिसांचे कौतुक, पहा काय म्हणाले गृहमंत्री?

अमरावती हिंसाचार प्रकरण; दोषींवर कडक कारवाईचे गृहमंत्र्यांकडून आश्वासन

Malegaon हिंसाचारातील 18 संशयितांना बेड्या, 41 जणांवर 5 गुन्हे दाखल

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...