पुणे : शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रश्नांबाबत असलेल्या विविध समस्या राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून सोडवाव्यात, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेने सोमवारी (30 ऑगस्ट) पुण्यात मोर्चा काढला. यावेळी राज्यभरातील मोठ्या संख्येने शेतकरी पुण्यातील कृषी आयुक्त कार्यालयावरील मोर्चात सहभागी झाले. 2020 मध्ये परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले होते. पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या या नुकसानीची भरपाई करतील असं आश्वासन त्यावेळी सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना दिलं. मात्र, प्रत्यक्षात केवळ मूठभर शेतकऱ्यांनाच नुकसानीची भरपाई देण्यात आली. याविरोधातच शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय.