AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीक विम्याचं ऑनलाईन ॲप बंद, नुकसानाची माहिती कुठं नोंदवायची, नांदेडच्या शेतकऱ्यांचा सवाल

महाराष्ट्रातील पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्याचं चिन्ह दिसत नाहीत. 2020 मधील पीक विम्याची नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

पीक विम्याचं ऑनलाईन ॲप बंद, नुकसानाची माहिती कुठं नोंदवायची, नांदेडच्या शेतकऱ्यांचा सवाल
नांदेड शेतकरी
| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 11:04 AM
Share

नांदेड: महाराष्ट्रातील पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्याचं चिन्ह दिसत नाहीत. 2020 मधील पीक विम्याची नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा भरपाई मिळाली नाही म्हणून आंदोलन करत आहेत. ही परिस्थिती असताना नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यासमोर नवीन संकट उभ राहिलंय. पीक विमा कंपन्यांचं ऑनलाईन अ‌ॅप बंद झाल्यानं नुकसानाची माहिती कुठं नोंदवायची असा प्रश्न निर्माण झालाय.

पीक विमा कंपन्याचे क्रॉप इन्शुरन्स ऑनलाईन अ‌ॅप बंदच असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होतंय. पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या नुकसानीची माहिती कंपनीच्या अ‌ॅपवर द्यायची असते. पण हे अ‌ॅप बंद असल्याने पीक विमा कंपन्यांकडे तक्रारीची नोंदच होतच नाहीये, त्यामुळे पीक विमा भरून देखील शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहातायत, याप्रकरणी मुखेडच्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केलीय. पीक विमा कंपनीचे हे अ‌ॅप तात्काळ सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

परभणीच्या शेतकऱ्यांचं पीक विम्यासाठी पुण्यात आंदोलन

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील डोंगरभागातील माखणी, पिंपळदरी महसुल मंडळातील शेतकऱ्यांनी पीक विमा प्रश्नी 15 ऑगस्ट रोजी आंदोलन केलं होतं. सन 2020-21 खरीप हंगामातील सोयाबीनचा पीकविमा मिळावा या साठी डोंगरी विकास जनआंदोलनाच्या वतीने पुण्यातील कृषी आयुक्तालय कार्यालया समोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं होतं.

3 हजार शेतकऱ्यांची तक्रार

सप्टेंबर – अक्टोबर महिन्यात गंगाखेड तालुक्यातील डोंगरभागात अतिवृष्टी झाली होती. यामुळे या भागातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या भागातील शेतकऱ्यांनी रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पीक विमा भरला होता. त्यामुळे रिलायंस कंपनीने शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देणे अपेक्षित होते. मात्र, 9 महिने उलटले तरीही शेतकऱ्यांना अजूनही पीकविम्याचे पैसे मिळाले नाहीत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. या बाबत शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत जवळपास 3 हजार शेतकऱ्यांनी वैयक्तिक तकार अर्ज दाखल केले आहेत.

पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करा

महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे पीक विम्याचा बीड पॅटर्न संपूर्ण राज्यभरात राबवण्यास परवानगी मागितली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात पीक विम्याचा बीड पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्यास परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करण्याची मागणी बीड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.

इतर बातम्या:

Tokyo Paralympics 2020: भाविनाने देशासह कुटुंबियांना समर्पित केलं पदक, नातेवाईकांनी गरबा खेळत साजरा केला विजय

SSC GD Constable 2021: एसएससी जीडी कॉन्स्टेबल 25 हजार जागांवर भरती, 31 ऑगस्टपर्यंत नोंदणींची संधी, वाचा सविस्तर

Nanded farmers complaint about crop insurance app to Agriculture Department

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.