AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन् त्याचा आनंद ठरला क्षणाचाच धरण क्षेत्र, पर्यटन स्थळी जाताना टाळा उताविळपणा; एका विद्यार्थ्याने जीव गमावला

Mansoon Update : मुंबईसह राज्यातील अनेक भागांना पावसाने झोडपून काढले आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी धबधबे ओसंडून वाहत आहेत. पण पावसाळी पर्यटन काहींच्या जीवावर बेतले आहे. प्रशासनाने पण असा धोक्याचा इशारा दिला आहे.

अन् त्याचा आनंद ठरला क्षणाचाच धरण क्षेत्र, पर्यटन स्थळी जाताना टाळा उताविळपणा; एका विद्यार्थ्याने जीव गमावला
जीवावर उदार होऊ नका
| Edited By: | Updated on: Jul 20, 2024 | 11:15 AM
Share

मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागात धबधबे ओसंडून वाहत आहेत. तर धरण क्षेत्रातील नदी-नाले वाहत आहेत. अनेक ठिकाणी निसर्गाने हिरवागार शालू नेसला आहे. पावसाळी पर्यटनासाठी अनेक जण बाहेर पडत आहेत. अनेक भागात पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होत आहे. तर काही ठिकाणी खोल खड्यांचा, निसरड्या भागाचा अंदाज न आल्याने पर्यटकांच्या मृत्याच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे पर्यटन स्थळी उताविळपणा, अति साहस टाळण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

कॉलेजला बुट्टी मारुन पर्यटन स्थळी गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कॉलेजला बुट्टी मारून पुाच मित्र मावळमधील कासारसाई धरणावर गेले होते. त्यातील एकाला जीव गमवावा लागला.पिंपरी-चिंचवडच्या थेरगाव येथील एका कॉलेजचा विद्यार्थी सारंग डोळसे याचा कासारसाई धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.

थेरगाव येथील ज्युनियर कॉलेजचे पाच विद्यार्थी घरातील पालक आणि शिक्षकांची नजर चुकवून कासारसाई धरणावर पर्यटनासाठी आले होते. धरणातील पाण्यात उतरून खेळण्याचा मोह या विद्यार्थ्यांना आवरला नाही .पाण्यात खेळत असताना पाण्याच्या खोलीचा सारंगला अंदाज आला नाही आणि क्षणार्धात खोल पाण्यात वाहून गेला.

मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर गावातील नागरिकांनी शिरगावं परंदवाडी पोलिसांना तात्काळ या घटनेची खबर दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ, तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमला पाचारण केले. रेस्क्यू टीमने काही वेळातच या विद्यार्थ्यांचा मृतदेह बाहेर काढला,

पर्यटकांना प्रशासनाचा इशारा

भुशी धरणाच्या पायऱ्यांवरील पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांना पायऱ्यांवर मज्जाव करण्यात आला आहे. मात्र पर्यटक जीवावर उदार होऊन पर्यटन करत असल्याचे चित्र आहे.लोणावळ्यात धुव्वा धार पाऊस झाल्याने भुशी धरणावरील पायऱ्यांवरील प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पर्यटकांना या भुशी धरणाच्या पायऱ्यांवर मज्जाव करण्यात आला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी स्थानिक जीवरक्षक तसेच पोलिसांकडून पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.मात्र पोलीस आणि स्थानिक जीवरक्षक यांच्याशी पर्यटक हुज्जत घालत या पायऱ्यांवर जात आहेत. लोणावळा दुर्घटनेनंतर देखील पर्यटकांना शहाणपण आलं नसल्याचं यातून दिसत आहे.

Follow Us
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत.
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय.
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार.
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी.
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ.
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....