AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅरेम, सोंगट्या आणि…, राज ठाकरे यांच्याकडून तीन शब्दांत राजकीय परिस्थितीचं वर्णन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर मिश्किल शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज ठाकरे यांनी राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंता देखील व्यक्त केली. पण सध्या ज्या घडामोडी सुरु आहेत त्याची सुरुवात शरद पवार यांच्यापासूनच झाली होती, असं राज ठाकरे म्हणाले.

कॅरेम, सोंगट्या आणि..., राज ठाकरे यांच्याकडून तीन शब्दांत राजकीय परिस्थितीचं वर्णन
| Updated on: Jul 04, 2023 | 6:28 PM
Share

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या परिस्थितीत अनपेक्षित अशा घडामोडी बघायला मिळत आहेत. विरोधात असणारे नेते आता एकत्र आले आहेत. कालपर्यंत एकमेकांवर टीका करणारे, आरोप-प्रत्यारोप करणारे नेते हे आता एकत्र सरकारमध्ये सामील झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांवर सडकून टीका केली होती. त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना गद्दार म्हणून हिणवलं होतं. तसेच त्यांनी भाजपवरही सडकून टीका केली होती. एकमेकांविरोधात टोकाची टीका करणारे नेतेमंडळी एकत्र आल्याने संपूर्ण राज्यात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सध्याच्या या राजकीय परिस्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत भाष्य केलं आहे.

‘शरद पवार यांच्याकडून सुरुवात’

“या सर्व गोष्टींची महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवात केली. त्यांनी जो पहिला पुलोदचा प्रयत्न केला त्यावेळी काय केलं? शरद पवार यांच्याकडून सुरुवात झाली. शेवट त्यांच्यापर्यंतच आला. पण मला तसं वाटत नाही.मला प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ ही माणसं अजित पवार यांच्याबरोबर जाण्यासारखी वाटत नाहीत. त्यामुळे ही तीन माणसं संशयास्पद वाटतात. अजित पवारांबरोबर जावून मंत्रिपद स्वीकारतील असं वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

‘उद्या समजा सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झालेल्या दिसल्या तर…’

“अजित पवार यांनी परवा एक स्टेटमेंट केलं की, सर्व होर्डिंग्जवर शरद पवार यांचे फोटो लावा. हे सगळं अनाकलनीय आहे. त्यामुळे उद्या समजा सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झालेल्या दिसल्या तर मला त्याचं आश्चर्य वाटणार नाही. ही गोष्ट अचानक घडलीय, असं नाहीय. ही गोष्ट गेल्या अनेक दिवसांपासून चालू होती. गेले कित्येक दिवस वातावरणात चालू होती. काल ती दिसली”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

‘कोणाच्या सोंगट्या कोणाच्या…’

“इतका चुकीचा कॅरेम फुटलाय ना कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहे ते कळत नाही. मला आसं वाटतं की, मी माझ्या लोकांना म्हटलो की, तुम्ही लोकंच आहात ज्यांना हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत म्हणून ओळखलं जातं. बाकी कुणाचा पत्ताच लागत नाही की कोण कोणत्या पक्षात आहे. महाराष्ट्राची दुर्देवी परिस्थिती आहे”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

“सध्याच्या राजकीय घडामोडींवरुन प्रत्येक घरामध्ये तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील. मी अनेकदा भाषणामध्ये बोललो आहे. मी काही दिवसांत मेळावा घेणार आहे. त्यावेळी या विषयावर सविस्तर बोलू”, असं राज ठाकरे यांनी सुरुवातीला सांगितलं. “आता घड्याळने काटा काढला की काट्याने घड्याळ काढला ते मला माहिती नाही”, असंदेखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.