AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मनसेचा मोठा निर्णय ‘; पक्षात महिलांच्या नियुक्तीला प्राधान्य

मनसेच्या माजी नगरसेवक रुपाली पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर आता मनसेकडून महिलांच्या नियुक्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित आज 140 महिलांना नियुक्ती पत्र देण्यात आली आहे. शहरातील पक्ष कार्यालयात ही पत्रे देण्यात आली.

रुपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मनसेचा मोठा निर्णय '; पक्षात महिलांच्या नियुक्तीला प्राधान्य
Raj Thackeray
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Dec 17, 2021 | 1:33 PM
Share

पुणे – रुपाली पाटील यांनी महाराष्ट्र नवा निर्माण सेनेला रामराम केल्यानंतर आता मनसेकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी महापालिका निवडणुकीता पक्ष संगठन बळकट करण्यासाठी विविध गोष्टी ककेल्या जात आहेत. मनसेच्या माजी नगरसेवक रुपाली पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर आता मनसेकडून महिलांच्या नियुक्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित आज 140महिलांना नियुक्ती पत्र देण्यात आली आहे. शहरातील पक्ष कार्यालयात ही पत्रे देण्यात आली.

पक्षाला मोठा झटका

खळखट्याक करणाऱ्या नेत्या म्हणून रुपाली पाटील यांची ओळखलया जात होत्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला राजीनामा दिल्याने पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना त्यांनी पक्ष सोडल्याचा फटका मनसेला बसणार आहे. पाटील यांची नाराजी दूर होईल असं सांगितलं जातं असतानाच राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपली पक्षातील नाराजी नेत्यांवर असलेली नाराजी उघड केली. पक्षातील मनसेचे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागसकर यांच्यावर नाराज असल्याचे सांगत , या दोघांनाही काम नसून रिकामटेकडे असल्याची टीका त्यांनी पत्रकर परिषदेत केली आहे.

काय आहे वाद रुपाली पाटील व मनसेच्या नेत्यांमध्ये समीर वानखेडे प्रकरणावरून वाद निर्माण झाला. समीर वानखेडे प्रकरणावर रुपाली पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर हा वाद सुरु झाला त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले होते की, ‘समीर वानखेडे यांनी दलितांवर अन्याय केल्याचे आरोप होत आहेत तर त्याची चौकशी करायला हवी अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र त्यावरून पक्षाचे उपनेते बाबू वागस्कर आणि रूपाली पाटील यांच्यात वाद झाला होता. प्रवक्ते पद नसताना रूपाली पाटील यांनी पक्षाच्या भूमिका मांडायला नको असं वागस्कर यांचं म्हणणं होतं. मात्र रुपाली पाटील यांनी त्याला जोरदार विरोध केला. वागसकर यांच्या पत्नीलाच शहराध्यक्ष पद देऊन माध्यमांना केवळ त्यांच्याशीच बोलावं असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे रूपाली पाटील कमालीच्या दुखावल्या होत्या. आपण सगळ्या तक्रारी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या मात्र त्यावर काहीही कारवाई झाली नाही. यामुळंच त्यांनी आपला राजीनामा दिला व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Kidney Stones | पोटदुखीचा त्रास, शिक्षकाच्या पोटात निघाले एक-दोन नव्हे, तब्बल 156 किडनी स्टोन्स

MLC election | राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये जुंपली, महाविकास आघाडीची मतं कशी फुटली?

MLC election | राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये जुंपली, महाविकास आघाडीची मतं कशी फुटली?

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक