AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC चा घोळ, आता तुम्हीच सांगा, जगायंच कसं, एमपीएससी विद्यार्थ्यांनी शरद पवारांकडे मांडल्या व्यथा

MPSC Student in Pune: प्रतिक्षा यादी, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया वेळेत करण्यासाठी कायदा करावा. महागाईमुळे खानावळ परवडत नाही. वडापाव खाऊन दिवस काढावे लागतात...अशा व्यथा शरद पवार यांच्यापुढे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मांडल्या.

MPSC चा घोळ, आता तुम्हीच सांगा, जगायंच कसं, एमपीएससी विद्यार्थ्यांनी शरद पवारांकडे मांडल्या व्यथा
mpsc student and sharad pawar (file photo)
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 07, 2024 | 11:26 AM
Share

पुणे शहरात एमपीएससी (MPSC) परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी लाखोंच्या संख्येने आहेत. सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहून हे रात्रंदिवस एक करत अभ्यास करत असतात. परंतु महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) धोरणांचा फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे. कधी परीक्षा होत नाही, परीक्षा झाल्या तर निकाल वेळेवर लागत नाही, निकाल लागला तर नियुक्ती वेळेवर होत नाही, या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याकडे आपल्या व्यथा आणि घरातील परिस्थिती मांडली. आता तुम्हीच सांगा, जगायंच कसं…असा प्रश्नच या विद्यार्थ्यांनी शरद पवार यांना विचारला.

असा झाला संवाद

अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीने “अस्वस्थ तरुणाईशी शरद पवार यांचा संवाद” कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीचा महिना आधीच निश्चित होता. त्यानंतरही एमपीएससी परीक्षेची तारीख जून महिन्यात ठेवली होती. आता ही परीक्षा रद्द केली. पुण्यात एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. त्यांना दोन वेळचा डबा आणि अभ्यासिका लावताना विचार करावा लागतो. पुण्यातील विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहण्यासाठी तुम्ही वेशांतर करुन सदाशिव पेठ किंवा नारायण पेठेत फिरा, असे लेशपाल जवळगे या विद्यार्थ्याने म्हटले.

एमपीएससीसाठी असा कायदाच करावा

पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली उझमा शेख हिचे पितृछत्र हरपले. आईने संघर्ष करुन शिकवले. परंतु परीक्षेतील घोळाचा फटका बसत असल्याचे तिने म्हटले. ती म्हणाली, प्रतिक्षा यादी, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया वेळेत करण्यासाठी कायदा करावा. विजय अंधाळे म्हणतो, प्रत्येक वेळी आम्ही अभ्यास करतो. मात्र परीक्षा रद्द होते किंवा पेपरफुटीचा प्रकार घडतो. त्यानंतर नवे वेळापत्रक येते. महागाईमुळे खानावळ परवडत नाही. वडापाव खाऊन दिवस काढावे लागतात.

शरद पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. आता निवडणुकीनंतर या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे शरद पवार यांनी सांगितले.

Follow Us
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.