AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सत्कार समारंभ आणि हार-तुरे घेण्यातच मुख्यमंत्री मग्न, राष्ट्रवादीच्या रवीकांत वरपेंची टीका

अजित पवार अशाप्रकारे पाहणी दौरे काढत असताना भाजपाच्या नेत्यांनी अजित पवारांवर वरतीमागून घोडे अशी टीका केली आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकारची वरात जनता काढल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका रवीकांत वरपेंनी केली.

NCP : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सत्कार समारंभ आणि हार-तुरे घेण्यातच मुख्यमंत्री मग्न, राष्ट्रवादीच्या रवीकांत वरपेंची टीका
एकनाथ शिंदेवर टीका करताना रवीकांत वरपेImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jul 29, 2022 | 7:48 PM
Share

पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासारखे असंवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजवर पाहिले नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते रवीकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यत शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री बंडखोरांच्या मतदारसंघात स्वागत समारंभ, मेळावे, हार-तुरे घेण्यासाठी जात आहेत, असा हल्लाबोल वरपे यांनी केला आहे. राज्यातील शेतकरी सध्या अडचणीत आहे. या शेतकऱ्यांना (Farmers) आधार देणे गरजेचे आहे, त्यांना मदत देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अडचणी समजून घेणे अपेक्षित आहे. मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक, मालेगाव, औरंगाबाद अशा बंडखोरांच्या मतदारसंघात स्वागत समारंभ, मेळावे, हार-तुरे घेण्यात मग्न आहेत, असे टीकास्त्र रवीकांत वरपेंनी सोडले. यावेळी त्यांनी नुकसानीची आकडेवारीसह माहिती दिली.

‘अजित पवार करत आहेत पाहणी’

आज महराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे 10 लाख हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 60 हजार हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. पशुधनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, शेतजमीन खरडून गेली आहे. अशातच राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार विदर्भ, मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर गेले आहेत. तेथील शेतकाऱ्यांच्या समस्या, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचा आढावा ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेत आहेत, असे वरपे म्हणाले.

‘जनता त्यांची वरात काढल्याशिवाय राहणार नाही’

अजित पवार अशाप्रकारे दौरे काढत असताना भाजपाच्या नेत्यांनी अजित पवारांवर वरतीमागून घोडे अशी टीका केली आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकारची वरात जनता काढल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री सत्कार, समारंभ, मेळाव्यात व्यस्त आहात. हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य म्हणावे लागेल, असा टोला युवक राष्ट्रवादीचे रविकांत वरपे यांनी लगावला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी राज्यातील विविध ठिकाणी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. याच चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. वरपे यांनी याविषयीची माहिती दिली. राज्यात सरकारकडून अतिवृष्टीची घोषणा त्याचबरोबर मदत अद्यापही जाहीर झालेली नाही, पंचनामे झालेले नाहीत. यावरून विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.