Pune : भाटघर धरणाने गाठला तळ, धरणात केवळ 8 टक्केच पाणीसाठा शिल्लक

भोर,खंडाळा,बारामती, इंदापूर, फलटण, सोलापूर तालुक्यातील शेतीला आणि गावांना धरणातून पाणी पुरवठा होतो. सध्या धरणात केवळ 8 टक्केच पाणी साठा शिल्लक आहे.

Pune : भाटघर धरणाने गाठला तळ, धरणात केवळ 8 टक्केच पाणीसाठा शिल्लक
भाटघर धरणाने गाठला तळImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 8:37 AM

पुणे : पुण्यातील (Pune) भोर (Bhor) तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर (Bhatghar) धरण क्षेत्रात अजूनही पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी ही झपाट्यानं कमी होऊ लागलीय. धरणातील पाणी साठ्यानं तळ गाठला आहे. सध्या धरणात केवळ 8 टक्केच पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. भोर, खंडाळा, बारामती, इंदापूर, फलटण, सोलापूर तालुक्यातील शेतीला आणि गावांना धरणातून पाणी पुरवठा होतो. गेल्या काही दिवसांपासून या भागातील शेतीला धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्यानं, धरणातील पाणीसाठा कमी झाल्याचं म्हटलं जात आहे. यंदा मान्सून वेळेच्या आगोदर दाखल होईल असा हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केला होता. परंतु जून महिना अर्धा संपत आलातरी समाधानकारक असा पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे.

8 टक्केच पाणी साठा शिल्लक

भोर, खंडाळा, बारामती, इंदापूर, फलटण, सोलापूर तालुक्यातील शेतीला आणि गावांना धरणातून पाणी पुरवठा होतो. सध्या धरणात केवळ 8 टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. यंदा कडक उन्हाळा असल्यामुळे धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला होता. धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे.त्यामुळे पाऊस वेळेवर दाखलं नाही झाला तर धरणावर अवलंबून असणाऱ्या गावांना पाणी टंचाईच्या संकटला सामोरं जाण्याची शक्यता आहे. भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण क्षेत्रात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही.

भाटघर धरणाची साठनं क्षमता 23.75 टीमसी एवढी आहे

भाटघर धरणाची साठनं क्षमता 23.75 टीमसी एवढी आहे, वेळवंड नदीच्या पात्रावर हे धरणं बांधण्यात आल आहे. धरणाचं कामं 1927 मध्ये पूर्ण झाल होतं. भोर, खंडाळा, बारामती, इंदापूर, फलटण, सोलापूर तालुक्यातील शेतीला आणि गावांना धरणातून पाणी पुरवठा होतो. धरणावर असणाऱ्या वीज निर्मिती केंद्रात पाटबंधारे विभागाच्या इरिगेशन वॉटर बेसवर मधून वार्षिक 54.535 मिलियन युनिट वीज निर्मिती केली जाते. सध्या धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतीसाठी तालुक्यांना वीज निर्मिती केंद्रातून 2 हजार 165 क्युसेकने उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलं होतं. त्यामुळं धरणातं केवळ 8 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यानं,पाण्याखाली गेलेली पांडव कालीन मंदिर दिसू लागली आहेत.

हे सुद्धा वाचा

ही मंदिर पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.