AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे शहरातील पाणी पुरवठासंदर्भात चंद्रकांत पाटील यांचा मोठा निर्णय, प्रशासनाला दिले आदेश

Pune News : पुणे शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच धरणांमधील जलसाठा वेगाने कमी होत आहे. यामुळेच पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट आहे. यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निर्णय जाहीर केला आहे.

पुणे शहरातील पाणी पुरवठासंदर्भात चंद्रकांत पाटील यांचा मोठा निर्णय, प्रशासनाला दिले आदेश
| Updated on: Apr 30, 2023 | 2:40 PM
Share

पुणे : एकीकडे ऐन उन्हाळ्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असताना दुसरीकडे मात्र राज्यातील अनेक शहरांमध्ये पाणी कपातीचे संकट घोंगावत आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा साठा वेगाने कमी होत आहे. यामुळे पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. यंदा एल निनोमुळे मॉन्सून (Monsoon) लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच जून-जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस पडणार नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुणेकरांना आतापासून उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

काय आहे निर्णय

पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील २६ धरणांपैकी २१ धरणांमधील जलसाठा घसरला आहे. हा जलसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे पुढील चार महिन्यांचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. पुणे जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात उजनीसह लहान मोठ्या एकूण २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी आहे.

यंदा या धरणांमध्ये २०२.६७ टीएमसी म्हणजेच १०२ टक्के जलसाठा झाला होता. परंतु पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी साठा शिल्लक आहे. यामुळे पाणी कपातीची पुणेकरांवर टांगती तलवार होती मात्र पाणी कपात न करण्याचे आदेश पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

नागरिकांना केले आवाहन

पुणे शहरासाठी पाणी कपात होणार नाही. परंतु जलसाठा कमी होत असल्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पुण्यातील नागरिकांना चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली होती. यामध्ये 15 मे नंतर पाणी कपातीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु आता पाणी कपात होणार नसल्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या...
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या....
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?.
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?.
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.