AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune rain : 28 जुलैनंतर पावसाचा जोर कमी होणार? पुण्यातल्या काही भागांत मुसळधार, हवामान विभागाचा इशारा

26 जुलैपर्यंत पुण्याच्या आसपासच्या घाट भागातही पावसाचा जोर वाढणार आहे. घाटात मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 28 जुलैनंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Pune rain : 28 जुलैनंतर पावसाचा जोर कमी होणार? पुण्यातल्या काही भागांत मुसळधार, हवामान विभागाचा इशारा
लोणावळा पाऊस, संग्रहित छायाचित्रImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jul 24, 2022 | 3:17 PM
Share

पुणे : पुण्यात पावसाची (Pune rain) तीव्रता वाढणार आहे. 25 जुलैपर्यंत पुणे शहराच्या हद्दीत आणि आसपासच्या घाट भागात पावसाची तीव्रता वाढेल आणि या कालावधीनंतर कमी होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे. शनिवारी पाषाण, लोहगाव, चिंचवड, लवळे, लोहेगाव या भागात पाऊस झाला नाही. शिवाजीनगरमध्ये केवळ 0.5 मिमी पाऊस झाला. आयएमडी पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी (Anupam Kashyapi) म्हणाले, की अरबी समुद्रातील वातावरणात बदल झाला आहे. शनिवारी पुणे शहर आणि जिल्ह्यात ढगांचे आच्छादन काहीसे जास्त प्रमाणातच होते. साहजिकच पावसाची शक्यताही त्यामुळे अंशतः वाढणार आहे. अंदाजामध्ये आम्ही 26 जुलैपर्यंत हलक्या पावसाचा उल्लेख केला असला तरी तो हलक्या पावसाच्या वरच्या मर्यादेपर्यंत पोहोचू शकतो किंवा त्यापेक्षा किंचित जास्त असू शकतो, असे ते म्हणाले.

मुसळधार पावसाचा इशारा

अरबी समुद्रातील पश्चिमेकडील प्रवाह अंशतः मजबूत झाल्यामुळे पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसर पुन्हा पावसाच्या पाण्याने युक्त होणार आहे. 26 जुलैपर्यंत पुण्याच्या आसपासच्या घाट भागातही पावसाचा जोर वाढणार आहे. घाटात मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती कश्यपी यांनी दिली. 28 जुलैनंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. कोकण आणि गोवा, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 24 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर 25 जुलैपर्यंत विदर्भासाठी हा इशारा कायम राहील, असे कश्यपी यांनी सांगितले.

राज्यात मान्सूनचा पाऊस कमी

जुलैच्या सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस न झालेल्या देशातील सर्व प्रदेशांमध्ये आता काही प्रमाणात जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडत आहे. यामध्ये वायव्य भारतातील प्रदेशांचाही समावेश आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कमी झाला आहे, असे त्यांनी सांगितले. 23-25 ​​जुलैदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि कोकणात या काळात पश्चिमेकडील वारे पुन्हा जोरात येण्याची शक्यता आहे, असेही कश्यपी म्हणाले.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?