AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…त्याशिवाय जागावाटप जाहीर करणार नाही; जयंत पाटील काय म्हणाले?

Jayant Patil on Mahavikas Aghadi Space Allocation Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीचं जागावाटप कधी?; जयंत पाटील काय म्हणाले? पुण्यात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर महत्वाचं विधान केलं आहे. जयंत पाटील काय म्हणाले? वाचा...

...त्याशिवाय जागावाटप जाहीर करणार नाही; जयंत पाटील काय म्हणाले?
| Updated on: Mar 10, 2024 | 3:57 PM
Share

अभिजित पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 10 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. कोणता पक्ष कुठून निवडणूक लढणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका होत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचं जागावाटप कधी होणार यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यत्र जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप कधी होणार? लोकसभेसाठी उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार? यावर जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

महाविकास आघाडीचं जागावाटप कधी?

महाविकास आघाडीचं जागावाटप कधी जाहीर होणार? असा प्रश्न जयंत पाटील यांनी पत्रकारांनी पुण्यात विचारला. त्यावर जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. वंचितला सोबत घेण्यावरही ते बोलले आहेत. आमची यादी तयार आहे. काहीही अडचण नाही. चर्चा चांगली झाली आहे. प्रस्ताव घेतलाय त्यांनी त्याच्या कार्यकारणी समोर मांडला आहे. जागावाटपाबाबत वंचितशी पूर्ण झाल्याशिवाय जागावाटप जाहीर करणार नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरु आहे. ते आमच्यासोबत येतील असा विश्वास आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

राज ठाकरेंच्या टीकेला जयंत पाटलांचं उत्तर

शरद पवार देशात राज्यात राजकारण केलं. जनतेच्या मनातील लोकांना घेतात. निवडणूक जिंकणाऱ्या निवडून आणून मोळी बांधतात. ज्यांना मोळी बांधता आली नाही त्याच्यावर काय बोलणार?, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. भाजपकडून या लोकसभा निवडणुकीत विजयाचा दावा केला जातो. त्यावर जयंत पाटलांनी उत्तर दिलं. भाजपला 400 पार त्यांना करायचं आहे. त्या नेत्यांना पुढचं दिसत असेल. म्हणून असं विधान केलं जातंय, असं जयंत पाटील म्हणाले.

“आयुक्त सरकारचं काम करतात, पक्षाचं नाही”

महापालिका आणि सरकार यांची चूक आहे. खासदार आमदारांचं नाव टाकायला हवी. विरोधक असतील तरीही नाव द्यायला हवं. पुणे महापालिका आयुक्त आणि सरकारची चाकरी करतात. कोणा करत पक्षाची नाही. त्यामुळं असं करू नये, असंही जयंत पाटील म्हणाले.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......