AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातून जाणार सेमी हायस्पीड ट्रेन? पाहा कसा असणार मार्ग

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे दोन्ही शहरांच्या औद्योगिक क्षेत्रांना नॉन-स्टॉप कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सेमी हायस्पीडचा हा प्रकल्प ब्रॉडगेजवर असावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय होणार आहे.

पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातून जाणार सेमी हायस्पीड ट्रेन? पाहा कसा असणार मार्ग
Image Credit source: Google
| Updated on: Feb 10, 2023 | 2:28 PM
Share

पुणे : नाशिकहून थेट पुण्याला (Nashik- Pune) सेमी हायस्पीड ट्रेनने (Pune Nashik high Speed Train) लवकरच जाता येणार आहे. या रेल्वे प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. त्याला प्राथमिक मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्प सुरु होणार आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांच्या औद्योगिक क्षेत्रांना नॉन-स्टॉप कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सेमी हायस्पीडचा हा प्रकल्प ब्रॉडगेजवर असावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय होणार आहे. महाराष्ट्र रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (Maharashtra Rail Infrastructure Development Corporation) म्हणजेच महारेलकडून हा प्रकल्प करण्यात येणार आहे.

वेग ताशी 200 किलोमीटर

पुणे-नाशिक दरम्यान सरळ रेल्वे मार्ग नाही. यामुळे पुण्याहून नाशिकला रेल्वे मार्गाने जाण्यासाठी कल्याण व कल्याणवरुन पुन्हा दुसऱ्या ट्रेनने नाशिक गाठावे लागते. यात सुमारे पाच ते सहा तास जातात. परंतु आता पुणे-नाशिक सरळ रेल्वे मार्ग होणार आहे. 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असणार आहे. नाशिक, नगर आणि पुणे अशा तीन जिल्ह्यांतून हा प्रकल्प जाणार आहे. हा प्रकल्प ब्रॉडगेजवर चालवल्यास शेतकरी आणि उद्योगांना मोठा फायदा होईल.

कसा आहे प्रकल्प?

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 235 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. या मार्गावर एकूण 24 स्थानके असणार आहेत. या मार्गामुळे नाशिक-पुणे अंतर फक्त पावणेदोन तासांत पुर्ण करता येणार आहे. ही रेल्वे प्रतितास 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे. दरम्यान, या रेल्वेच्या कामासाठी जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

  •  235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग
  • रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार
  •  रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग
  • पुढे हा वेग 250 किलोमीटरपर्यंत वाढवणार
  •  पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार
  • वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पूरक प्रकल्प
  • पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी
  • 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित

कसा होणार खर्च?

  •  प्रवासी आणि मालवाहतूक चालणार
  • रेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह
  •  स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य
  • प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार
  • प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था
  • 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा
  •  कमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार
  •  विद्युतीकरणासह एकाचवेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.