पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातून जाणार सेमी हायस्पीड ट्रेन? पाहा कसा असणार मार्ग

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे दोन्ही शहरांच्या औद्योगिक क्षेत्रांना नॉन-स्टॉप कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सेमी हायस्पीडचा हा प्रकल्प ब्रॉडगेजवर असावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय होणार आहे.

पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातून जाणार सेमी हायस्पीड ट्रेन? पाहा कसा असणार मार्ग
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 2:28 PM

पुणे : नाशिकहून थेट पुण्याला (Nashik- Pune) सेमी हायस्पीड ट्रेनने (Pune Nashik high Speed Train) लवकरच जाता येणार आहे. या रेल्वे प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. त्याला प्राथमिक मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्प सुरु होणार आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांच्या औद्योगिक क्षेत्रांना नॉन-स्टॉप कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सेमी हायस्पीडचा हा प्रकल्प ब्रॉडगेजवर असावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय होणार आहे. महाराष्ट्र रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (Maharashtra Rail Infrastructure Development Corporation) म्हणजेच महारेलकडून हा प्रकल्प करण्यात येणार आहे.

वेग ताशी 200 किलोमीटर

हे सुद्धा वाचा

पुणे-नाशिक दरम्यान सरळ रेल्वे मार्ग नाही. यामुळे पुण्याहून नाशिकला रेल्वे मार्गाने जाण्यासाठी कल्याण व कल्याणवरुन पुन्हा दुसऱ्या ट्रेनने नाशिक गाठावे लागते. यात सुमारे पाच ते सहा तास जातात. परंतु आता पुणे-नाशिक सरळ रेल्वे मार्ग होणार आहे. 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असणार आहे. नाशिक, नगर आणि पुणे अशा तीन जिल्ह्यांतून हा प्रकल्प जाणार आहे. हा प्रकल्प ब्रॉडगेजवर चालवल्यास शेतकरी आणि उद्योगांना मोठा फायदा होईल.

कसा आहे प्रकल्प?

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 235 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. या मार्गावर एकूण 24 स्थानके असणार आहेत. या मार्गामुळे नाशिक-पुणे अंतर फक्त पावणेदोन तासांत पुर्ण करता येणार आहे. ही रेल्वे प्रतितास 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे. दरम्यान, या रेल्वेच्या कामासाठी जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

  •  235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग
  • रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार
  •  रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग
  • पुढे हा वेग 250 किलोमीटरपर्यंत वाढवणार
  •  पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार
  • वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पूरक प्रकल्प
  • पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी
  • 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित

कसा होणार खर्च?

  •  प्रवासी आणि मालवाहतूक चालणार
  • रेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह
  •  स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य
  • प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार
  • प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था
  • 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा
  •  कमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार
  •  विद्युतीकरणासह एकाचवेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार
Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.