AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्याच्या ग्रामीण भागातही लागू होणार नाईट कर्फ्यू? जिल्हाधिकारी घेणार मोठा निर्णय

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संचारबंदी लागू करायची की नाही, याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे बुधवारी घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुण्याच्या ग्रामीण भागातही लागू होणार नाईट कर्फ्यू? जिल्हाधिकारी घेणार मोठा निर्णय
| Edited By: | Updated on: Dec 23, 2020 | 8:19 AM
Share

पुणे : राज्यात कोरोनाचा (Corona) धोका कमी होताच सर्व काही पुन्हा सुरू झालं होतं. पण कोरोनाने आणखी रौद्र रुप घेतल्याचं समोर आलं आहे. ब्रिटनमध्ये (britain)आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार पुणे (Pune) शहरामध्येही मंगळवारी रात्रीपासून संचारबंदी (night curfew) लागू करण्यात आली. परंतू जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संचारबंदी लागू करायची की नाही, याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे बुधवारी घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण अशात पुणेकरांनी काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (pune night curfew update new corona strikes in britain pune airport rules news update)

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार केलेल्या कृती दलाच्या अधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक होणार असून यामध्ये संचारबंदीविषयी चर्चा केली जाणार आहे. या बैठकीमध्ये करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारी म्हणून पुणे महापालिकेनेही काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

युरोप तसंच दुबईतून मायदेशी परतणाऱ्या सर्व प्रवाश्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असणार आहे. इतकंच नाही तर 7 दिवस हॉटेल त्यानंतर 7 दिवस होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. त्या बाबतच्या मार्गदर्शक नियमावलींचा आदेश पुणे महापालिका प्रशासनाच्यावतीने जाहिर करण्यात आला आहे.

काय आहे नियमावली?

– पुणे विमानतळावर युरोपातील देशांमधून तसेच मध्य पूर्व देशांसह दुबईतून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर स्वॅब टेस्ट रिपोर्ट बंधनकारक असणार आहे.

– ज्यांच्याकडे रिपोर्ट नसेल त्यांना टेस्ट करावी लागणार

– त्यामध्ये कोरोनाग्रस्त आढळल्यास नायडू सांसर्गिक रुग्णालयात दाखल केले जाणार

– तसेच चाचणी निगटिव्ह जरी आली तरी 7 दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन होणे बंधनकारक असेल

– त्यानंतर 5 ते 7 दिवस होम क्वारंटाईन देखील व्हावं लागणार

– यावेळी प्रवाश्यांना पीएमपीएमएलच्या बसमधून हॉटेलपर्यंत नेण्यात येणार

– सर्वांचे पासपोर्ट ताब्यात घेऊन डिस्चार्जच्या वेळी ज्या त्या व्यक्तींना पासपोर्ट पुन्हा दिले जातील

– यासोबतच ज्या प्रवाश्यांनी गेल्या 15 दिवसांमध्ये लंडन शहराला भेट दिली, प्रवास केला, त्यांनादेखील क्वारंटाईन व्हावं, असे प्रशासनाकडून आवाहन (pune night curfew update new corona strikes in britain pune airport rules news update)

इतर बातम्या –

ब्रिटनच्या कोरोनाचा धसका, ठाणे पोलिस आयुक्त अ‌ॅक्शन मोड, शहरात कडक संचारबंदीसह वाहनांची कसून तपासणी

पुण्यात आणखी एक गवा, पण येतायत कुठून?

(pune night curfew update new corona strikes in britain pune airport rules news update)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.