AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Sadabhau Khot : सरकार कारखानदारांचं, म्हणूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत नाही; पुण्यात सदाभाऊ खोतांचा सरकारवर आरोप

शेतकऱ्यांना सरकार मारत आहे. शेतकऱ्यांचे फड पेटत आहेत. त्याच्यामध्ये माझा बळीराजा आत्महत्या करत आहे आणि हे निर्ढावलेले सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

Pune Sadabhau Khot : सरकार कारखानदारांचं, म्हणूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत नाही; पुण्यात सदाभाऊ खोतांचा सरकारवर आरोप
सदाभाऊ खोतImage Credit source: tv9
| Updated on: May 18, 2022 | 12:26 PM
Share

पुणे : सरकार कारखानदारांचे आहे, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली नाही, असा आरोप रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे. काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन जे साखर कारखाने 1 मे नंतर ऊस गाळप करणार आहेत, त्यांना प्रति टन 200 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. ते म्हणाले, की राज्यामध्ये 15 लाख प्रति हेक्टर ऊस (Sugercane) हा गाळपाविना राहणार आहे. त्या शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 1 लाख रुपये मदतीची घोषणा सरकारने करायला पाहिजे होती. पण हे सरकार कारखानदारांचे आहे. त्यांनी शेतकऱ्यांना मात्र मदत केली नाही. आता ऊसाची चिपाडे झालेली आहेत. ऊसाचे वजन घटले आहे, म्हणूनच ज्यांचा ऊस 1 मे नंतर जाईल त्या शेतकऱ्यांना (Farmers) प्रति टन 1000 रुपये अनुदान सरकारने देण्याची गरज होती, ते केले नाही, अशी टीका त्यांनी केली.

‘शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम’

अतिरिक्त ऊसाच्या उत्पादनावर सरकार समाधानकारक तोडगा काढत नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अनुदान देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढावा, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. हे सरकार कारखानदारांना पोसणारे आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना सरकार मारत आहे. शेतकऱ्यांचे फड पेटत आहेत. त्याच्यामध्ये माझा बळीराजा आत्महत्या करत आहे आणि हे निर्ढावलेले सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे, असा घणाघात त्यांनी केला आहे. दरम्यान, सरकारच्या या शेतकरी धोरणांविरोधात 20 मेला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे आंदोलन पुकारले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

सरकारने काय निर्णय घेतला?

राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि कारखानदारांसाठी मोठा निर्णय घेतला. अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मेपासून म्हणजेच अतिरिक्त ऊस गाळप अनुदान मिळणार आहे. उसाला 200 रुपये प्रति टन तर वाहतुकीसाठी 5 रुपये प्रति टन अशा स्वरुपात हे अनुदान असणार आहे. राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.