Pune Sadabhau Khot : सरकार कारखानदारांचं, म्हणूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत नाही; पुण्यात सदाभाऊ खोतांचा सरकारवर आरोप

शेतकऱ्यांना सरकार मारत आहे. शेतकऱ्यांचे फड पेटत आहेत. त्याच्यामध्ये माझा बळीराजा आत्महत्या करत आहे आणि हे निर्ढावलेले सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

Pune Sadabhau Khot : सरकार कारखानदारांचं, म्हणूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत नाही; पुण्यात सदाभाऊ खोतांचा सरकारवर आरोप
सदाभाऊ खोतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 12:26 PM

पुणे : सरकार कारखानदारांचे आहे, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली नाही, असा आरोप रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे. काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन जे साखर कारखाने 1 मे नंतर ऊस गाळप करणार आहेत, त्यांना प्रति टन 200 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. ते म्हणाले, की राज्यामध्ये 15 लाख प्रति हेक्टर ऊस (Sugercane) हा गाळपाविना राहणार आहे. त्या शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 1 लाख रुपये मदतीची घोषणा सरकारने करायला पाहिजे होती. पण हे सरकार कारखानदारांचे आहे. त्यांनी शेतकऱ्यांना मात्र मदत केली नाही. आता ऊसाची चिपाडे झालेली आहेत. ऊसाचे वजन घटले आहे, म्हणूनच ज्यांचा ऊस 1 मे नंतर जाईल त्या शेतकऱ्यांना (Farmers) प्रति टन 1000 रुपये अनुदान सरकारने देण्याची गरज होती, ते केले नाही, अशी टीका त्यांनी केली.

‘शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम’

अतिरिक्त ऊसाच्या उत्पादनावर सरकार समाधानकारक तोडगा काढत नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अनुदान देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढावा, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. हे सरकार कारखानदारांना पोसणारे आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना सरकार मारत आहे. शेतकऱ्यांचे फड पेटत आहेत. त्याच्यामध्ये माझा बळीराजा आत्महत्या करत आहे आणि हे निर्ढावलेले सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे, असा घणाघात त्यांनी केला आहे. दरम्यान, सरकारच्या या शेतकरी धोरणांविरोधात 20 मेला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे आंदोलन पुकारले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

हे सुद्धा वाचा

सरकारने काय निर्णय घेतला?

राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि कारखानदारांसाठी मोठा निर्णय घेतला. अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मेपासून म्हणजेच अतिरिक्त ऊस गाळप अनुदान मिळणार आहे. उसाला 200 रुपये प्रति टन तर वाहतुकीसाठी 5 रुपये प्रति टन अशा स्वरुपात हे अनुदान असणार आहे. राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.