AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Sanjay Raut : देशातलं वातावरण पाहता इंग्रजांची राजवट बरी होती, असं म्हणायची वेळ आली; पुण्यात संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

नवनीत राणा (Navneet Rana) यांना राज्य सरकारकडून मिळालेल्या वागणुकीवरून भाजपा नेते किरीट सोमैया यांनी सवाल उपस्थित केला होता, त्यावर विचारले असता त्यांनी केंद्रावर टीका करत इंग्रजांची राजवट यांच्यापेक्षा चांगली होती, अशी टीका केली.

Pune Sanjay Raut : देशातलं वातावरण पाहता इंग्रजांची राजवट बरी होती, असं म्हणायची वेळ आली; पुण्यात संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल
केंद्र सरकारवर टीका करताना संजय राऊतImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 06, 2022 | 12:24 PM
Share

पुणे : देशात सध्या दिलासा घोटाळा सुरू आहे. त्याला विविध कंगोरे आहेत. गुन्हे किंवा आरोप फक्त आमच्यावरच सिद्ध होतात. इतरांवर ते का सिद्ध होत नाहीत, हा संशोधनाचा विषय असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. शिवसेना (Shivsena) मेळाव्याच्या निमित्ताने ते सध्या शहरात आहे, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशात ज्याप्रकारची राजवट सुरू आहे, त्यावरून असे वाटते की इंग्रजांची राजवट सुरू आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. नवनीत राणा (Navneet Rana) यांना राज्य सरकारकडून मिळालेल्या वागणुकीवरून भाजपा नेते किरीट सोमैया यांनी सवाल उपस्थित केला होता, त्यावर विचारले असता त्यांनी केंद्रावर टीका करत इंग्रजांची राजवट यांच्यापेक्षा चांगली होती, अशी टीका केली.

‘शिवसेनेने जिथे सभा घेतल्या तिथे इतिहास रचला’

औरंगाबादच्या मराठवाडा सांकृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेच्या अनेक सभा झाल्या आहेत. काल कोणी सभा घेतली म्हणून शिवसेनेची तिथे सभा होत नाही. तर गर्दीने ओसंडून जाणाऱ्या सभा तिथे घेतल्या जातील, असे संजय राऊत म्हणाले. शिवसेनेने जिथे जिथे सभा घेतल्या तिथे इतिहास झाला, असेही ते म्हणाले. राज ठाकरेंची सभा झाली म्हणून शिवसेनेची सभा होत असल्याचा आरोप यावेळी संजय राऊत यांनी खोडून काढला.

‘उचलली जीभ लावली टाळ्याला’

जे टीका करत आहेत, त्यांचे स्थान काय आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला असे कुणीही करू नये. आपला पूर्वइतिहास तपासून आपण राजकारणावर बोलायला हवे, अशी टीका त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केली. राज्यात बहुजनांचे सरकार आले हा दावा फसवा असल्याचे वक्तव्य पडळकर यांनी केले होते. त्यावर त्यांनी पलटवार केला. कोण बोलत आहे, त्या बोलणाऱ्याची भूमिका काय, राजकारणातले, समाजकारणातले स्थान काय, पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, असे सवाल करत पूर्वइतिहास पाहून बोलावे, अशी टीका पडळकर यांच्यावर केली.

काय म्हणाले संजय राऊत?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.