AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार?; म्हणाले, आताच्या घडीला…

Vasant More on Jayant Patil : वसंत मोरे हे शरद पवार गटात प्रवेश करणार का? याची पुण्यात जोरदार चर्चा होत आहे. यावर आता स्वत: वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांच्या कालच्या विधानावरही वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...

ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार?; म्हणाले, आताच्या घडीला...
वसंत मोरे, जयंत पाटीलImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 11, 2024 | 11:52 AM
Share

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. पुणेकरांमध्येदेखील तशी चर्चा पाहायला मिळत आहे. कारण काल शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कात्रजच्या सभेत एक विधान केलं अन् या चर्चांना उधाण आलं आहे. वसंत मोरेंच्या हाती कधीही तुतारी देऊ शकतो, असं जयंत पाटील म्हणाले. त्यांचं हे विधान चर्चेत आहे. याच विधानामुळे वसंत मोरे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

वसंत मोरे यांचं स्पष्टीकरण

मीच जयंत पाटील यांना बोललो होतो. अवघ्या काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका आहेत. मी पहिल्यांदाच आयुष्यात राष्ट्रवादीच्या स्टेजवर बसलो होतो. आताच्या घडीला आम्ही हातात मशाल घेऊन तुतारी वाजवायला तयार आहोत. महानगरपालिकेच्या निवडणुकीला देखील मशाल, तुतारी, हाताचा पंजा एकत्र राहिला पाहिजे ही खबरदारी घ्या. आम्ही हातात मशाल घेऊन कधीच तुतारी वाजवायची तयारी केलीय. माझ्या प्रभागात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला तुतारी हातात घ्यायची गरज पडणार नाही, असं वसंत मोरे म्हणालेत.

जयंत पाटील काय म्हणाले होते?

शरद पवारांना सोडण्याचं काहीही कारण नाही. सगळ्यांच्या मागे भुंगे होते म्हणून गेले. वसंत मोरे तुम्ही आता मशाल घेतलीय तुमच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ शकतो. वसंत मोरे तुमच्या हातात आता मशाल आहे. तुमच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ शकतो, असं विधान जयंत पाटील यांनी काल कात्रजच्या सभेत केलं. त्यानंतर पुण्यात चर्चांना उधाण आलं. वसंत मोरे ठाकरे गटाला राम राम करत शरद पवार गटात जाणार का? यावर चर्चा होऊ लागली असं असतानाच आता वसंत मोरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडीला 100% पोषक वातावरण आहे. मुस्लिम आणि माळी समाजाचा मतदान महाविकास आघाडीला होणार आहे. भारतीय जनता पार्टीने राजकारणाचा विचका केलाय त्यामुळे लोकांना राजकारणात इंटरेस्ट राहिला नाही. खडकवासला आणि हडपसरमध्ये तुतारीचा आमदार होणार आहे, असं वसंत मोरे म्हणाले.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?