AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीची हत्या झाली, स्थानिक पोलिसांचा त्रास, पुण्यातील महिलेने गाठला उत्तर प्रदेश

महिलेची मुले आहेत का? मग मुले आईला का सोडून गेली आहेत?  या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहे. तसेच महिलेचे इतर कोणी नातेवाईक आहेत का?  याचाही तपास घेतला जात आहे. 

पतीची हत्या झाली, स्थानिक पोलिसांचा त्रास, पुण्यातील महिलेने गाठला उत्तर प्रदेश
| Updated on: Feb 12, 2023 | 2:25 PM
Share

फरेंडा, उत्तर प्रदेश : पुणे शहरातील (Pune Citu) एक महिला उत्तर प्रदेशात पोहचली. फरेंडा येथे असहायपणे भटकत असताना तिला रिक्षा चालकाने पाहिले. तिची चौकशी केली. त्यानंतर तिला धीर देत फरेंडा पोलीस ठाण्यात (Police Staion)नेले. त्या महिलेने पोलिसांसमोर आपबिती सांगितली. पोलिसांनी तिला मदतीचे आश्वासन दिले. परंतु खरी परिस्थिती चौकशीनंतरच समजणार आहे. पतीच्या हत्येनंतर (Crime)पोलिसांचा त्रास सुरु झाला आणि मुलेही सोडून गेल्याचा दावा त्या महिलेने केला आहे. महिलेची मुले आहेत का? मग मुले आईला का सोडून गेली आहेत?  या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहे.

नेमकी काय आहे घटना

पुणे शहरातील नऱ्हे परिसरात अशोक आर्य पत्नी रुचासह राहत होते. रुचा हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचे पती अशोक आर्य एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. परंतु त्यांची हत्या झाली. पतीच्या हत्येनंतर मुले सोडून हैदराबादला गेले.

नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्थानिक पोलिसांचा त्रास सुरु झाला. त्यामुळे तिला आपले उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले. मग तिने पुणे सोडले आणि भटकंती करु लागली. भटकता भटकता ती फरेंडा या शहरात पोहचली. रिक्षा चालकाने तिला पोलीस ठाण्यात आणले.

पोलिसांनी दिले आश्वासन

रुचा हिची परिस्थिती पाहून फरेंडा पोलिसांनी तिला मदतीचे आश्वासन दिले. तिला विश्वास घेऊन चौकशी केली. तिने घरमालकाचा मोबाईल क्रमांक दिला आहे. पोलिसांनी रुचा हिच्या घरमालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु खरी माहिती चौकशीअंतीच समजणार असल्याचे पोलिसानी सांगितले.

महिलेची मुले आहेत का? मग मुले आईला का सोडून गेली आहेत?  या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहे. तसेच महिलेचे इतर कोणी नातेवाईक आहेत का?  याचाही तपास घेतला जात आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.