AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवडी न्हावा-शेवा झाल्याने रायगड बरबाद होईल; राज ठाकरे यांचा दावा

Raj Thackeray | शिवडी न्हावा-शेवा झाल्याने रायगड बरबाद होईल, असे वक्तव्य मनसे नेते राज ठाकरे यांनी केले. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात प्रकट मुलाखतीत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढत, राज्यातील जनतेने जागरुक होण्याची गरज व्यक्त केली. काय म्हणाले मनसे अध्यक्ष...

शिवडी न्हावा-शेवा झाल्याने रायगड बरबाद होईल; राज ठाकरे यांचा दावा
raj thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 07, 2024 | 5:19 PM
Share

पिंपरी, पुणे | 7 जानेवारी 2024 : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत गाजली. त्यांनी खास ठाकरी शैलीत अनेक गोष्टींचा समाचार घेतलाच. पण कलाकारांना काही हिताचे सल्ले सुद्धा दिले. राज ठाकरे यांच्या सुक्ष्म निरीक्षणाची यावेळी चर्चा झाली. न्हावा-शेवा सागरी सेतू हा देशातील सर्वात मोठा सागरी पूल आहे. 12 जानेवारी 2024 रोजी त्याच्या उद्धघाटनाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी या सागरी सेतूविषयी त्यांचे मत मांडले. शिवडी न्हावा-शेवा झाल्याने रायगड बरबाद होईल, या त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाला ही चपराक मानण्यात येत आहे.

सरकारचं सापडलं कोंडीत

मला बुलेट ट्रेनचं काही कळलं नाही. दोन तासात अहमदाबादला जाणार काय करणार. ढोकळा खाणार आणि येणार. करायचं काय. मुंबईत चांगला मिळतो. त्यासाठी एक लाख कोटी कशाला घालवायचे आहे. मराठी माणसाचं चारही बाजूला लक्ष हवं. तो दक्ष असला पाहिजे. मी काल सांगितलं ते आजही सांगेल, अशी टीका त्यांनी बुलटे ट्रेनवर केली.

महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत

ज्याला इतिहास म्हणतो तो भूगोलावर अवलंबुन आहे. भूगोल म्हणजे जमीन. तुमची जमीन ताब्यात घेणं. तुम्ही सर्व युद्ध पाहिली. शिवाजी महाराजाांनी २८ किल्ले दिले. जमीन. म्हणजे भूगोल काबीज करण्यासाठी लढाया झाला त्याला इतिहास म्हणतो. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे. महाराष्ट्राची जमीन पूर्वी युद्ध करून घ्यायचे. आता चालाखीने घेतली जाते. ते तुम्हाला कळत नाही. जमिनीचा तुकडा म्हणजे तुमचं अस्तित्व. तेच तुमच्या हातून घेण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली.

न्हावा-शेवाबाबत काय भूमिका

न्हावा शेवा सागरी सेतूवर त्यांनी घणाघाती टिका केली. हा सेतू सर्वात अगोदर रायगड जिल्हा बरबाद करेल, असे वक्तव्य त्यांनी केले. बाहेरील लोक येऊन रायगडमध्ये जमिनी खरेदी करत आहेत. स्थानिक लोक जमिनी विकत आहे. हे राज्यकर्त्यांना दिसत नाही का, असा सवाल त्यांनी केला. जमिनी विकणारे हेच लोक पुढे नोकर होतील. या लोकांच्या हाताखाली काम करतील. हा डाव ओळखण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

Follow Us
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत.
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.