AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवडी न्हावा-शेवा झाल्याने रायगड बरबाद होईल; राज ठाकरे यांचा दावा

Raj Thackeray | शिवडी न्हावा-शेवा झाल्याने रायगड बरबाद होईल, असे वक्तव्य मनसे नेते राज ठाकरे यांनी केले. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात प्रकट मुलाखतीत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढत, राज्यातील जनतेने जागरुक होण्याची गरज व्यक्त केली. काय म्हणाले मनसे अध्यक्ष...

शिवडी न्हावा-शेवा झाल्याने रायगड बरबाद होईल; राज ठाकरे यांचा दावा
raj thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 07, 2024 | 5:19 PM
Share

पिंपरी, पुणे | 7 जानेवारी 2024 : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत गाजली. त्यांनी खास ठाकरी शैलीत अनेक गोष्टींचा समाचार घेतलाच. पण कलाकारांना काही हिताचे सल्ले सुद्धा दिले. राज ठाकरे यांच्या सुक्ष्म निरीक्षणाची यावेळी चर्चा झाली. न्हावा-शेवा सागरी सेतू हा देशातील सर्वात मोठा सागरी पूल आहे. 12 जानेवारी 2024 रोजी त्याच्या उद्धघाटनाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी या सागरी सेतूविषयी त्यांचे मत मांडले. शिवडी न्हावा-शेवा झाल्याने रायगड बरबाद होईल, या त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाला ही चपराक मानण्यात येत आहे.

सरकारचं सापडलं कोंडीत

मला बुलेट ट्रेनचं काही कळलं नाही. दोन तासात अहमदाबादला जाणार काय करणार. ढोकळा खाणार आणि येणार. करायचं काय. मुंबईत चांगला मिळतो. त्यासाठी एक लाख कोटी कशाला घालवायचे आहे. मराठी माणसाचं चारही बाजूला लक्ष हवं. तो दक्ष असला पाहिजे. मी काल सांगितलं ते आजही सांगेल, अशी टीका त्यांनी बुलटे ट्रेनवर केली.

महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत

ज्याला इतिहास म्हणतो तो भूगोलावर अवलंबुन आहे. भूगोल म्हणजे जमीन. तुमची जमीन ताब्यात घेणं. तुम्ही सर्व युद्ध पाहिली. शिवाजी महाराजाांनी २८ किल्ले दिले. जमीन. म्हणजे भूगोल काबीज करण्यासाठी लढाया झाला त्याला इतिहास म्हणतो. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे. महाराष्ट्राची जमीन पूर्वी युद्ध करून घ्यायचे. आता चालाखीने घेतली जाते. ते तुम्हाला कळत नाही. जमिनीचा तुकडा म्हणजे तुमचं अस्तित्व. तेच तुमच्या हातून घेण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली.

न्हावा-शेवाबाबत काय भूमिका

न्हावा शेवा सागरी सेतूवर त्यांनी घणाघाती टिका केली. हा सेतू सर्वात अगोदर रायगड जिल्हा बरबाद करेल, असे वक्तव्य त्यांनी केले. बाहेरील लोक येऊन रायगडमध्ये जमिनी खरेदी करत आहेत. स्थानिक लोक जमिनी विकत आहे. हे राज्यकर्त्यांना दिसत नाही का, असा सवाल त्यांनी केला. जमिनी विकणारे हेच लोक पुढे नोकर होतील. या लोकांच्या हाताखाली काम करतील. हा डाव ओळखण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...