AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Mango season : कर्नाटकातल्या पावसाचा पुण्याच्या आंबा हंगामावर परिणाम; असनी चक्रीवादळामुळे सुरू आहे पाऊस

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कर्नाटकातील फळबाग मालक आणि शेतकरी त्यांचा माल पुण्याच्या बाजारपेठेत आणण्यास सुरुवात करतात. मात्र, यावर्षी कर्नाटकातील उत्पादकांनी त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम करणाऱ्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधले आहे.

Pune Mango season : कर्नाटकातल्या पावसाचा पुण्याच्या आंबा हंगामावर परिणाम; असनी चक्रीवादळामुळे सुरू आहे पाऊस
हापूस आंबा (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: May 12, 2022 | 4:28 PM
Share

पुणे : असनी चक्रीवादळामुळे (Asani cyclone) झालेल्या पावसामुळे पुण्यातील आंब्याचा हंगाम काही आठवडे कमी होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील आंब्याच्या पुरवठ्याला फटका बसेल, असे आंबा शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे, कारण गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे (Rain) फळबागांची गुणवत्ता आणि प्रमाण या दोन्हींवर परिणाम होत आहे. शहराच्या घाऊक बाजारात काम करणारे कमिशन यांच्या म्हणण्यानुसार, कर्नाटकात पावसाने फळबागांना तडे गेल्यास हंगाम मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपू शकतो. तुमकुरु कोलार, चिकमंगळुरू, हावेरी आणि चित्रदुर्ग हे कर्नाटकातील काही प्रमुख आंबा पिकवणारे जिल्हे (Mango growing districts) आहेत, जे पुण्याच्या बाजारपेठा पुरवतात. हापूस, कर्नाटकच्या किनारी प्रदेशातील उत्पादन एप्रिलच्या सुरुवातीला बाजारपेठेत दाखल होत असताना, राज्यातील आंब्याचे प्रकार हे ठरवतात, की फळांचा पुरवठा जूनच्या मध्यापर्यंत टिकतो.

पावसामुळे गळून पडली डिसेंबरमध्ये आलेली पहिली फुले

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कर्नाटकातील फळबाग मालक आणि शेतकरी त्यांचा माल पुण्याच्या बाजारपेठेत आणण्यास सुरुवात करतात. मात्र, यावर्षी कर्नाटकातील उत्पादकांनी त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम करणाऱ्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधले आहे. तुमकुरु जिल्ह्यातील आंबा बागायतदार म्हणाले, की हंगामाच्या सुरुवातीलाच त्यांना अनेक त्रुटींचा सामना करावा लागला. डिसेंबरमध्ये आलेली पहिली फुले पावसामुळे गळून पडली आणि दुसऱ्या फुलांमुळे वेगळीच समस्या निर्माण झाली. ते म्हणाले, की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या पावसामुळे फळांची नासाडी झाली आणि आता आपण जी फळे काढत आहोत त्याची गुणवत्ता धोक्यात आली आहे.

कापणी केलेल्या फळांपैकी फक्त 30 टक्के फळे बाजारपेठेसाठी तयार

आणखी एका शेतकऱ्याने सांगितले, की कापणी केलेल्या फळांपैकी फक्त 30 टक्के फळे बाजारपेठेसाठी तयार आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपला माल जवळच्या रस काढणाऱ्यांना विकायला सुरुवात केली आहे. कर्नाटक आणि कोकण किनाऱ्यावरून आवक झाल्यामुळे सध्या कर्नाटकातील आंबे 200-300 रुपये प्रति डझन दराने विकले जात आहेत. कोकण आंब्याचा हंगाम मे महिन्याच्या मध्यापर्यंत संपण्याची शक्यता असताना, कर्नाटकातील आंब्याचे उत्पादन महिनाअखेरपर्यंत बाजारात येत राहील. मात्र, कर्नाटकातून आवक नेहमीपेक्षा कमी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हंगामाची सुरुवात प्रतिकूल वातावरणाने झाली आहे आणि चक्रीवादळामुळे पाऊस पडल्याने चिंतेत भर पडेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी