AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Raj Thackeray : चाहत्यांच्या प्रेमानं भारावले राज ठाकरे, पुणे भेटीत नागरिकांना नमस्कार केला अन् शुभेच्छाही स्वीकारल्या

गोविंद सखाराम देसाई लिखित मराठी रियासतचे आठ खंड, मृत्यूंजय या पुस्तकाची नवी आवृत्ती यासोबतच अनेक ऐतिहासिक, आत्मचरित्र आणि कला क्षेत्रातली पुस्तके राज ठाकरे यांनी खरेदी केली आहेत.

Pune Raj Thackeray : चाहत्यांच्या प्रेमानं भारावले राज ठाकरे, पुणे भेटीत नागरिकांना नमस्कार केला अन् शुभेच्छाही स्वीकारल्या
पुस्तके खरेदी करताना राज ठाकरेImage Credit source: tv9
| Updated on: May 18, 2022 | 3:13 PM
Share

पुणे : अक्षरधारा पुस्तक खरेदी करून बाहेर आल्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बराच वेळ थांबलेल्या अनेक महिला व नागरिकांच्या जवळ येऊन नमस्कार केला व शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी भरपूर पुस्तके (Books) खरेदी केली आहेत. या पुस्तक खरेदीला जातानाचा त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे, जगू द्या, असे यावेळी ते माध्यमांना बोलल्याचेही सर्वत्र व्हायरल (Viral) झाले आहे. यादरम्यान राज ठाकरे यांनी 200हून अधिक पुस्तके खरेदी केली आहेत. दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी अक्षरधारा बुक गॅलरीतून तब्बल 50 हजारांची पुस्तके खरेदी केली आहेत. विविध विषयांवरील तब्बल 200हून अधिक पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे.

विविध पुस्तके खरेदी केली

गोविंद सखाराम देसाई लिखित मराठी रियासतचे आठ खंड, मृत्यूंजय या पुस्तकाची नवी आवृत्ती यासोबतच अनेक ऐतिहासिक, आत्मचरित्र आणि कला क्षेत्रातली पुस्तके त्यांनी खरेदी केली आहेत. पुस्तके खरेदी करत असताना राज ठाकरे यावेळी थांबलेले असताना अनेक महिला तसेच नागरिक त्यांच्या जवळ येत होते, स्वाक्षरी मागत होते. त्यांचे प्रेम पाहून राज ठाकरे यांनीही त्यांना वेळ दिला. त्यांना नमस्कार करून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. काहींना त्यांनी स्वाक्षरीही दिली.

माध्यम प्रतिनिधींवर संतापले राज ठाकरे

राज ठाकरे हे अक्षरधारा बुक गॅलरीला भेट देण्यासाठी आले असता, तिथे अनेक माध्यम प्रतिनिधी आणि कॅमेरामन उपस्थित होते. संध्याकाळची वेळ असल्यामुळे कॅमेऱ्यावर फोकसही लावण्यात आला होता. मात्र, त्याचा त्रास जाणवू लागल्याने राज यांनी ते बंद करायला लावले. त्यावेळी थोडे पुढे येत काय जगू द्याल की नाही? बंद कर ते.. वेगळे सांगू का सगळ्यांना? असे राज ठाकरे म्हणाले. त्यांचा संताप यावेळी पाहायला मिळाला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.