AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राहुल गांधी यांची दाढी आणि नरेंद्र मोदी यांची बॉडी’, रामदास आठवले कवितेतून व्यक्त

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा उल्लेख केलाय.

'राहुल गांधी यांची दाढी आणि नरेंद्र मोदी यांची बॉडी', रामदास आठवले कवितेतून व्यक्त
रामदास आठवले
| Edited By: Chetan Patil | Updated on: Feb 18, 2023 | 7:55 PM
Share

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा उल्लेख केलाय. यावेळी ते कवितेच्या माध्यमातून व्यक्त झालेत. “राहुल गांधी जितनी बढानी है उतनी बढाओ दाढी, नरेंद्र मोदी की मजबूत है बॉडी”, अशा शब्दांत रामदास आठवले यांनी कवितेतून राहुल गांधींवर निशाना साधलाय. रामदास आठवले यांनी यावेळी राज्यातील सध्याच्या विविध राजकीय घडामोडींवर देखील भाष्य करत स्वत:ची भूमिका मांडलीय.

भारत जोडण्याची राहुल गांधींना गरज नाही. सत्तर वर्षे सत्ता असताना तुम्ही भारत जोडला नाही, असं म्हणायचं का? आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हाच भारत जोडलेला आहे, असं रामदास आठवले म्हणाले. “सबका साथ सबका विकास म्हणून नरेंद्र मोदी यांनी भारत मजबूत केलेला आहे. त्यामुळे तुम्ही काँग्रेस जोडा, तुम्ही जिथून पडलात तिथून निवडून. या तुमचा पक्ष वाढवा”, असं आवाहन त्यांनी काँग्रेसला केलंय.

‘निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीचा आदर करणारा’

“निवडणूक आयोगाने दिलेला निकाल शिंदे गटाच्या बाजूने आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले ते लोकशाहीचा आदर करणारं आहे. यात लोकशाहीचा कुठेही अपमान नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमताने आमदार आणि खासदार आहेत. उद्धव ठाकरेंकडे अगदी कमी मेजॉरिटी असल्यामुळे, निवडणूक आयोगाने हा निकाल दिला आहे आणि त्याचे स्वागत करतो”, असा दावा रामदास आठवले यांनी केला.

‘…तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती’

“शिवसेने भाजपसोबत युती केली असती तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं. त्यावेळेस तुम्ही तिघे मिळून एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यावेळेस 105 आमदार असून सुद्धा भाजप विरोधी बाकावर बसली. त्यावेळी आम्ही बहुमताचा आदर केला. आणि तुम्ही सत्ता भोगली. त्यामुळे आता 164 आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या पाठीमागे असल्याने भाजप युतीचे सरकार आहे”, असं आठवले म्हणाले.

‘वंचितच्या युतीने फारसा फरक पडणार नाही’

“वंचित बहुजन आघाडीचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत युती झाली असली तरी, त्याचा फारसा परिणाम दिसत नाही. कारण त्यांच्यामध्ये फार मतभेद दिसत आहेत. कारण पिंपरी चिंचवडमध्ये अपक्ष राहुल कलाटेंना वंचितने पाठिंबा दिलेला आहे”, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.

“कसबा विधानसभा मतदारसंघातील वंचितची भूमिका आणखी स्पष्ट झाली नाही. त्यामुळे त्या युतीला जास्त महत्त्व द्यायचं नाही. आणि रिपब्लिक आठवले गटाचे आमचे सगळे कार्यकर्ते, घराघरात जाऊन या ठिकाणी हे प्रचार करत आहेत. आम्हाला विश्वास आहे की ते प्रचंड मताने निवडून येतील आणि संपूर्ण आमच्या पक्षाच्या पाठिशी आहेत”, असं रामदास आठवले म्हणाले.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...