RTE Admission| 30 सप्टेंबरपर्यंतच ‘आरटीई’ प्रवेश; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाचा काय आहे निर्णय?

आरटीईची 25  टक्के राखीव जागांची प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या शाळांच्या नोंदणीची शिक्षणाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी. ज्या शाळा पात्र असूनही नोंदणी न करणाऱ्या किंवा 25 टक्के जागा उपलब्ध करून न देणाऱ्या शाळांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

RTE Admission|  30 सप्टेंबरपर्यंतच 'आरटीई' प्रवेश; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाचा काय आहे निर्णय?
प्रातिनिधिक फोटो Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 1:19 PM

प्राजक्ता ढेकळे , पुणे – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया दीर्घकाळ सुरु राहिल्याने विद्यार्थ्याने नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक व उपस्थितीचे नुकसान टाळण्यासाठी यंदा येत्या 30 सप्टेंबरपर्यंतच आरटीईअंतर्गत प्रवेश परीक्षा(Admission under RTE) राबवण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने (Directorate of Elementary Education)घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्ष 2022 -23 मध्ये होणारी आरटीईअंतर्गत प्रवेश परीक्षा 30  सप्टेंबरपर्यंतच संपवण्यास सांगण्यात आले आहे. याबरोबरच सप्टेंबरनंतरही जागा रिक्त राहिल्या तरी प्रवेशाची प्रक्रिया बंद केली जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर (Director of Primary Education Dinkar Temkar)यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. तश्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अशी असेल प्रक्रिया येत्या 2022-23 च्या शैक्षणिक वर्षात आरटीईच्या 25  टक्के राखीव जागांसाठी एकदाच सोडत एकदाच सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर या सोडतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल. या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा लघुसंदेश पाठवला जाईल. पहिल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन जागा रिक्त राहिल्यास दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

 संस्थांवर होणार कारवाई चालू वर्षापासून शाळांची नवीन नोंदणी करताना नव्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांत तीन वर्षांपर्यंत आरटीईचे प्रवेश देऊ नयेत. संबंधित शाळांची गुणवत्ता आणि सर्वसाधारण प्रवेश तपासून निर्णय घ्यावा. आरटीईची 25  टक्के राखीव जागांची प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या शाळांच्या नोंदणीची शिक्षणाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी. ज्या शाळा पात्र असूनही नोंदणी न करणाऱ्या किंवा 25 टक्के जागा उपलब्ध करून न देणाऱ्या शाळांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांत आरटीई प्रवेश प्रक्रियेशी संबंधित काही अधिकारी-कर्मचारी करोनाबाधित झाल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या. मात्र शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत शाळांची नोंदणी पूर्ण करण्यात येईल. तसेच प्रवेश प्रक्रिया मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Khan Sir : RRB NTPC निकालाविरोधात विद्यार्थ्यांचं हिसंक आंदोलन, खान सरांवर एफआयर दाखल, नेमकं कारण काय?

शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी स्वतंत्र भारत पक्षाची सरकारसह वीज कंपनीला नोटीस, काय आहे प्रकरण?

Royal Enfield Scram 411 लाँचची तारीख पुढे ढकलली, जाणून घ्या कधी सादर होणार बहुप्रतीक्षित बाईक?

Non Stop LIVE Update
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो.
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय.
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....