AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसब्यातून ठाकरे गटाचा मित्र पक्ष लढणार, ठाकरेंच्या मित्र पक्षाकडून मविआची कोंडी; काँग्रेसला निवडणूक जड जाणार?

सात-आठ महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार देऊ नका, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंबेडकरांना केलं आहे.

कसब्यातून ठाकरे गटाचा मित्र पक्ष लढणार, ठाकरेंच्या मित्र पक्षाकडून मविआची कोंडी; काँग्रेसला निवडणूक जड जाणार?
sambhaji brigadeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 06, 2023 | 9:46 AM
Share

पुणे: कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढणार आहे. ही जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेला सोडण्यात आली नाही. मात्र, असं असलं तरी कसब्याच्या निवडणुकीत आता नवा ट्विस्ट आला आहे. ठाकरे गटाचे मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची कोंडी होण्याची शक्यता आहे. संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटासोबत युती आहे. त्यांचा महाविकास आघाडीत समावेश नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने या निवडणुकीत उमेदवार दिला असल्याचं सांगितलं जात असून त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

संभाजी ब्रिगेडही कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मोहिते आज उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कसब्याची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचा घटक नाही

काही महिन्यांपूर्वीच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युती केली होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीत येईल अशी चर्चा होती. परंतु, ब्रिगेडचा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.

वंचितही लढणार?

संभाजी ब्रिगेडपाठोपाठ वंचित बहुजन आघाडीही कसब्यासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. कसब्याची जागा लढायची की नाही याबाबत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आज निर्णय घेणार आहेत. वंचितनेही नुकतीच ठाकरे गटासोबत युती केली आहे.

वंचितचा अजूनही महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. त्यातच शिवसेना कसब्याची निवडणूक लढवत नाहीये. त्यामुळे वंचितने ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांचा आंबेडकरांना फोन

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना फोन करून कसबा आणि चिंचवडमधून उमेदवार न देण्याची विनंती केली आहे. लोकप्रतिनिधीचं निधन झाल्याने होणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची परंपरा आहे. ती पाळली गेली पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी आंबेडकरांकडे व्यक्त केली आहे.

तर, सात-आठ महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार देऊ नका, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंबेडकरांना केलं आहे.

Follow Us
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?