AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीच्या आवंढीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 23 जनावरांचा मृत्यू

सांगलीच्या जत तालुक्यातील आवंढी येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे. (23 pet animals died due to dog bite )

सांगलीच्या आवंढीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 23 जनावरांचा मृत्यू
प्रातिनिधीक फोटो
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Jan 25, 2021 | 6:38 PM
Share

सांगली: सातारा जिल्ह्या पाठोपाठ सांगली जिल्ह्यातही पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील आवंढी येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी परिसरात धुमाकूळ घातला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक जनावरांना चावा घेतला आहे. पशूवैधकीय अधिकाऱ्यांना याबाबत कळवूनही वेळेत रेबिजची लस दिली नसल्याने या जनावरांचा मुत्यू झाला असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. (Sangli Avandhi village 23 pet animals died due to dog bite )

आतापर्यंत 23 जनावरांचा मृत्यू

आवंढीत गेल्या आठवड्यात काही पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकुळ घातला होता.या कुत्र्यांनी गावातील एक बैल, पाच गायी, त्यांची चार लहान पिले, आणि म्हैसींचा चावा घेतला. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी आवंढी पशूवैद्यकीय डॉक्टराना याबाबत माहिती दिली. मात्र, वेळेत उपचार झाले नाहीत.आणखी काही जनावरांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यांनाही रेबिज झाल्याचा संशय आहे. जनावरांना लवकरात लवकर लसीकरण केले नाही तर ती देखील दगावण्याचा धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत 23 जनावरं दगावली आहेत.

दरम्यान, शासनाने लाखो रुपये खर्चून आवंढी येथे श्रेणी 1 दर्जाच्या दवाखान्याची प्रशस्त इमारत बांधली आहे.मात्र, या दवाखान्याला कायमस्वरूपी डॉक्टर मिळालेला नाही. कित्येक वर्षापासून प्रभारी अधिकाऱ्यांकडे कारभार देण्यात आला आहे. परिणामी वेळेत उपचार होत नसल्याने जनावरांचा डोळ्यादेखत मुत्यू होताना शेतकऱ्यांना पाहावं लागत आहे. या प्रकाराची चौकशी करून संबधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

जत पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागानं आवंढी गावाला भेट दिली. पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या जनावरांना लसीकरण केले होते. पण, जनावरांच्या मानेला आणि डोक्याला चावा घेतल्यानं ती जनावरं जगू शकलं नाहीत. पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणं गरजेचे असल्याच्या सूचना ग्रामपंचयातीला दिल्याचं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आवंढी गावातील जितकी जनावरं दगावली आहेत त्याबाबतची नुकसानभरपाई मिळण्याबाबत प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येतील, असंही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्यांच्या घरातील जनावर दगावली असतील त्यांनी सरकारी दवाखान्यात जाऊन रेबिज प्रतिबंधक लस घेणं गरेजेचे आहे, असं आवाहन देखील केले आहे.

साताऱ्यात दोघांचा मृत्यू

सातारा शहराजवळ असणारया जकातवाडी आणि डबेवाडी गावात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांना चावा घेतल्यामुळे यामधील जखमी झालेल्या 21 वर्षीय तरुणी रुपाली माने आणि 23 वर्षीय तरुण देवानंद लोंढे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मागील 15 दिवसांपुर्वी पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 10 ते 15 जण जखमी झाले आहेत या पैकी 5 जणांवर अजून ही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या:

साताऱ्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस, रेबीजवर औषध न मिळाल्याने दोघांचा मृत्यू

भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी?, आंदोलनात लोकं घुसवली; प्रवीण दरेकरांची टीका

(Sangli Avandhi village 23 pet animals died due to dog bite )

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका