AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संकटांवर संकटे येत आहेत, संघर्ष होत आहेत, पण उद्धव ठाकरे…संजय राऊत यांनी शिवसैनिकांना सांगितले ते रहस्य

sanjay raut in pune: एडीआरचा रिपोर्ट आला. देशातील ५३८ मतदारसंघात हेराफेरी झाली आहे. प्रत्यक्ष मतदान आणि मोजलेली मतांमध्ये तफावत आहे. ३६२ मतदारसंघ असे आहेत की त्यात त्यातील आकडे झालेल्या मतदानापेक्षा साडे सहा लाख कमी आहेत. १७६ मतदारसंघ असे आहेत की त्यात दोन लाख मते जास्त मोजली आहे.

संकटांवर संकटे येत आहेत, संघर्ष होत आहेत, पण उद्धव ठाकरे...संजय राऊत यांनी शिवसैनिकांना सांगितले ते रहस्य
sanjay raut
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 03, 2024 | 1:42 PM
Share

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जो मंत्र दिला एक तर तू राहिशील किंवा मी राहणार, हाच मंत्र घेऊन आपणास पुढे जायचे आहे. एवढं घडत आहे. संकटावर संकट येत आहे, संघर्ष होत आहे. कोंडी केली जात आहे. पण आमचा नेता हसत संकटाला सामना देत आहे आणि आम्हाला लढण्याची प्रेरणा देत आहेत. समोर जो जळफळाट सुरू आहे, त्याचं कारण उद्धवजींचं हास्य आहे, असे शिवसेना उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले. पुण्यात शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा शनिवारी झाला. त्यावेळी संजय राऊत बोलत होते.

तर मोद गेलेच होते…

संजय राऊत पुढे म्हणाले की, तुम्हारे जैसे कुत्ते भोकते रहेंगे, लेकीन हम हटेंगे नही. तू राहशील नाही तर मी राहील हे सांगणारा आमचा नेता उद्धव ठाकरे आहे. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. लोकसभेत जसे पाहिजे तसे यश मिळालं नाही. दहशत पैसा आणि नवीन पक्ष सर्व काही होते. त्यामुळे आपल्याला संघर्ष करावा लागला. पण यावेळी आपल्याला अधिक मेहनत करावी लागणार आहे. लोकसभेत अनेक ठिकाणी आपण गाफिल राहिलो. नाही तर मोदी गेलेच होते. मोदी तो गयो म्हटले असते.

लोकसभा निवडणुकीत हेराफेरी

एडीआरचा रिपोर्ट आला. देशातील ५३८ मतदारसंघात हेराफेरी झाली आहे. प्रत्यक्ष मतदान आणि मोजलेली मतांमध्ये तफावत आहे. ३६२ मतदारसंघ असे आहेत की त्यात त्यातील आकडे झालेल्या मतदानापेक्षा साडे सहा लाख कमी आहेत. १७६ मतदारसंघ असे आहेत की त्यात दोन लाख मते जास्त मोजली आहे. हा आकडा आपल्याला कमी दिसतो. चार मतदारसंघ आपण अत्यंत कमी मताने हरलो आहोत. ५० पासून ते १२ हजार मतांपर्यंत.

मुंबईची जागा ४८ मतांनी. हातकणंगले ४८ हजार मताने हरलो. उत्तर प्रदेशातील मतदारसंघात १०० ते हजार मतांनी भाजप जिंकला आहे. मतदान केंद्रावरील आपल्या लोकांनी गाफिलपणा दाखवला. त्यामुळे त्यांनी विजय चोरला, नाही तर भाजपचा पराभव झाला होता. ३५ ते ४० मतदारसंघ देशातील असे होते, त्यात पाच ते सहा लाखाची मते चोरून विजय मिळवला आहे. या प्रकारचे उद्योग विधानसभेत मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Follow Us
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...