AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्षाची स्थिती, आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय, शरद पवारांकडून कानपिचक्या

सध्या एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय आणि दिलगिरी व्यक्त करण्याची दुर्दैवी वेळ येते, अशा शब्दात शरद पवारांनी राजकीय नेत्यांना कान पिचक्या दिल्या आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्षाची स्थिती, आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय, शरद पवारांकडून कानपिचक्या
| Edited By: | Updated on: Sep 05, 2021 | 6:38 PM
Share

पुणे: मंचर येथे स्वर्गीय खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील सह अन्य आजी-माजी आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी सध्याच्या राजकारण्यांच्या कान टोचले. सध्या एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय आणि दिलगिरी व्यक्त करण्याची दुर्दैवी वेळ येते, अशा शब्दात शरद पवारांनी राजकीय नेत्यांना कान पिचक्या दिल्या आहेत.

शरद पवारांकडून राजकारण्यांना कानपिचक्या

महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्दैवाने आज संघर्ष दिसत आहे. एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय. मग वक्तव्य मागे घ्यावे लागतायेत त्यांच्यावर दिलगिरी ही व्यक्त करण्याची वेळ येते. महाराष्ट्रातील ही आजची परिस्थिती आहे.किसनराव बाणखेले विरोधात असताना देखील जे वागायचे, त्याची कमतरता दिसते, असं शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कुणामुळं?

शिवसेना नेते संजय राऊत आणि शरद पवार यांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीच सरकार आलं. मुख्यमंत्री स्वतः व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित राहणार होते. पण त्यांना बैठक लागली. त्यांनी खासदार राऊतांकडे निरोप दिलेला आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

खासदार संजय राऊत यांनी काल राष्ट्रवादी आमदार दिलीप मोहिते पाटलांवर शेलक्या शब्दात समाचार घेतला होता. संजय राऊत यांनी भाषण सुरू केले असता प्रमुख मान्यवरांची नावे घेत असताना खेड विधानसभा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा नाव घेताच उपस्थिता मध्ये एकच हशा पिकाला होता.

कोरोना नियमांना तिलांजली

जुन्नर नंतर आंबेगावातील मंचर मधील कार्यक्रमात कोरोना नियमांना तिलांजली दिली गेली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. विशेष बाब म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघात हा कार्यक्रम सुरू होता.

आमच्या काळात शेतमाल फेकून देण्याची वेळ येऊ दिली नाही

माझ्याकडे 10 वर्ष कृषी खात होत. माझं लक्ष असल्यानं एक गोष्ट कटाक्षाने पाळली. शेतकऱ्यांच्या मालाला चांगली किंमत दिली तर हाच शेतकरी आर्थिक कणा सुधारवेल. माझ्याकडे केंद्रीय कृषी खातं होतं पण आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही. भाजी, टोमॅटो याचे दर खाली येऊ दिले नाही. पण सध्या शेतकरी मेटाकुटीला आलाय. टोमॅटो, शिमला मिर्ची फेकून द्यावे लागले आणि साखरेचे भाव वाढत आहेत, अशीच परिस्थिती राहिली. तर उसाला दर जादा देता येईल, यासाठी लक्ष देण्याची गरज आहे, असा टोला शरद पवार यांनी केंद्र सरकारला लगावला.

इतर बातम्या:

राज ठाकरे म्हणतात, ओबीसींच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव; चंद्रकांतदादा म्हणाले, राज म्हणतात ते बरोबर!

सायबर गुन्हेगारांची नवी ट्रिक, निवृत्त कर्मचाऱ्यांना लक्ष्य, मुंबईत एका कर्मचाऱ्याला दीड कोटींनी फसवलं

Sharad Pawar slams politicians of Maharashtra who not follow limit in debate

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.