AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Neelam Gorhe : नवनीत राणा आणि रवी राणा हे भाजपाचे भाडोत्री शेंदाडशिपाई; हनुमान चालिसावरून नीलम गोऱ्हेंचा बाण

आ. रवी राणा आणि खा. नवनीत राणा हे भाडोत्री टॅक्सी आहेत. भाजपाचे (BJP) हे भाडोत्री शेंदाडशिपाई असल्याची घणाघाती टीका शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.

Pune Neelam Gorhe : नवनीत राणा आणि रवी राणा हे भाजपाचे भाडोत्री शेंदाडशिपाई; हनुमान चालिसावरून नीलम गोऱ्हेंचा बाण
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेImage Credit source: tv9
| Updated on: Apr 23, 2022 | 12:40 PM
Share

पुणे : आ. रवी राणा आणि खा. नवनीत राणा हे भाडोत्री टॅक्सी आहेत. हनुमान चालिसा (Hanuman chalisa) हे श्रद्धापूर्वक करण्याची बाब आहे. परंतू त्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर होत आहे. यास आमचा नेहमीच विरोध असणार आहे. भाजपाचे (BJP) हे भाडोत्री शेंदाडशिपाई असल्याची घणाघाती टीका शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. मागील दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्याचे आंदोलन सुरू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मातोश्रीबाहेर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यावर टीका करत भाजपावरही निशाणा साधला. यात राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवसैनिकही आक्रमक

राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिका राजकारणावरून वातावरण तापले असताना कालपासूनच शिवसैनिकही मातोश्रीवर ठाण मांडून आहेत. काल काही शिवसैनिकांनी रात्री नवनीत राणा यांच्या घराबाहेर जाऊन निदर्शने केली. रात्रभर शिवसैनिक राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर ठाण मांडून होते. तर काही शिवसैनिक मातोश्रीबाहेर जोरदार घोषणाबाजी करत राणा दाम्पत्यांचा निषेध नोंदवत होते.

राणा दाम्पत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना दिलेत. आम्हाला धमकावण्याचा आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय. भगवंताला प्रार्थना करतो. या सगळ्यांना बुद्धी येवो. बाळासाहेबांच्या विचारांवर या सगळ्यांनी चालावे, असे आम्ही आवाहन करतो. यांचे डोके ठिकाणावर आले पाहिजे. त्यासाठी आम्ही मातोश्रीवर जाणार. पठण करणार. पण पोलीस आम्हाला थांबवत आहेत, असा आरोप राणा दाम्पत्याने लावला आहे.

आणखी वाचा :

Supriya Sule : किती हल्ले झाले, मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्दही काढला नाही, त्यांच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान; सुप्रिया सुळेंकडून कौतुक

Pune Chandrakant Patil : मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला तर तुमची काय अडचण? चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला

Sanjay Raut on BJP, Navneet Rana: आय रिपीट… राष्ट्रपती राजवट लावाच; राऊत फडणवीसांना म्हणाले, तुम्हाला का मिरच्या झोंबतात?

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.