AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Chandrakant Patil : मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला तर तुमची काय अडचण? चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला

मशिदीवरचे भोंगे काढणार नसाल तर आम्ही हनुमान चालिसाचे भोंगे वाजवू, अशी भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंना मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी पाठिंबा दिला, तर तुमची अडचण काय, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे.

Pune Chandrakant Patil : मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला तर तुमची काय अडचण? चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला
अजानवरून शिवसेनेवर टीका करताना चंद्रकांत पाटीलImage Credit source: tv9
| Updated on: Apr 23, 2022 | 10:45 AM
Share

पुणे : मशिदीवरचे भोंगे काढणार नसाल तर आम्ही हनुमान चालिसाचे भोंगे वाजवू, अशी भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंना मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी पाठिंबा दिला, तर तुमची अडचण काय, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. अजानचा अर्थ काय तो समजून सांगायला हवा. जे नमाजला येत नाही, त्यांना येण्यास प्रवृत्त करा. मशिदींमध्ये भोंगे लावू शकता. त्याचा आवाज बाहेर जाता कामा नये. म्हणजेच नमाज (Namaz) अदा करणाऱ्यांसाठी आतमध्ये व्यवस्था करा. महिला अजानला येत नाहीत. तर त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करावी. अलिकडे स्मार्टफोन आले आहेत. त्यामध्ये नमाज टाकला येईल. मात्र अशा मुद्द्यांमधून का वाद निर्माण केले जात आहेत, हे कळत नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

‘मारून मुटकूनची सहानुभूती’

शिवसैनिकांची सहानुभूती मारून मुटकून मिळवताहेत, अशी टीकादेखील चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. सर्वसामान्यांची सहानुभूती हनुमान चालिसाचा आग्रह धरणाऱ्या राज ठाकरेंविषयीच आहे. काय प्रॉब्लेम आहे यांचा हे समजत नाही. अजानच्या बाबतीत काही नियमावली आहे. मशिदींच्या आत ऐकायला काहीच समस्या नाही. मात्र ज्यांचा काहीच संबंध नाही, त्यांना तुम्ही कशाला ऐकवता, असा सवाल यावेळी त्यांनी केला.

‘कितीही हल्ले केले तरी घाबरणार नाही’

माझ्या घरासमोर कोणी पूजा सांगायला आले तर मी म्हणेन बाहेर का, घरात या. आम्ही प्रसादाची सोय केली असती. अशी टीका त्यांनी केली. प्रत्येकवेळी भाजपावर टीका करतात. सध्या ऊन पण खूप आहे. यामागेसुद्धा भाजपाचा हात आहे असे म्हणतील, असेही ते म्हणाले. तर आम्ही घाबरणार नाहीत. आम्ही चळवळीतले लोक आहोत. कितीही हल्ले केले तरी घाबरणार नाही, असे ते म्हणाले.

आणखी वाचा :

Rana vs Thackeray : ‘भीमरुपी महारुद्रा…’ हनुमान चालिसेला मारुतीस्तोत्रानं शिवेसनेचं प्रत्युत्तर! राणांच्या घराबाहेर ‘बोल बजरंग बली की जय’

Mohit Kamboj Car attack : ‘कंबोज यांच्या गाडीत हॉकी स्टीक्स आणि हत्यारं होती’ विनायक राऊतांचा सनसनाटी आरोप

Rana vs Thackeray : शिवसैनिक रवी राणांच्या इमारतीत घुसले! ‘आम्ही त्यांना सोडणार नाय’ शिवसैनिक आक्रमक

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.