AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे राठी हत्याकांडातील फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीची 28 वर्षानंतर कशी झाली मुक्तता?

पुणे शहरातील हत्याकांड प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीला सर्वोच्च न्यायालयाने सोडले. त्या आरोपीने केलेल्या एका दाव्यानंतर त्याची कारागृहातून मुक्तता झाली. तो तब्बल 28 वर्षांपासून कारागृहात होता. तीन वर्ष त्या आरोपीच्या दाव्याचा तपास सुरु होता.

पुणे राठी हत्याकांडातील फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीची 28 वर्षानंतर कशी झाली मुक्तता?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2023 | 6:12 PM
Share

पुणे : पुणे शहराला नाही तर देशात गाजलेल्या राठी हत्याकांड प्रकरणात वेगळाच निर्णय आला आहे. 1994 मधील या राठी हत्‍याकांडातील प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीची शिक्षा जन्मठेपेत केली गेली. त्यानंतर त्याने केलेल्या एका दाव्यानंतर आता त्याला कारागृहातून बाहेर काढण्यात आले. 28 वर्षांपासून कारागृहात असलेल्या आरोपीला का सोडले गेले? कोणत्या दाव्यामुळे त्याला सोडण्यात आले? पाहूया नेमके काय घडेल. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता.

काय आहे प्रकार

पुणे शहरातील पौड रस्त्यावरील शिला विहार कॉलनीत 1994 मध्ये भरदिवसा सात जणांची हत्या झाली होती. मिठाईच्या दुकानात पगारवाढ न केल्यामुळे दुकानाचे मालक केसरीमल राठी यांच्या अपहरणाचा कट आरोपींनी रचला. परंतु त्याचा हा डाव फसल्यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्वांची निर्घृण हत्या केली. त्यात केसरीमल राठी यांच्या पत्नी मीराबाई (वय ५०), मुली प्रीती (वय २१), हेमलता नावंदर (वय २४), सून नीता (वय २५), नातू प्रतीक (वय दीड वर्ष), चिराग (वय ४) आणि मोलकरीण सत्यभामा सुतार (वय ४५) यांचा समावेश होता.

कोण आहेत आरोपी

राठी हत्याकांड प्रकरणात राजू राजपुरोहित , जितू नैनसिंग गेहलोत, नारायण चेताराम चौधरी ( सर्व रा. राजस्थान ) हे आरोपी होते. पोलिसांच्या तपासात ते स्पष्ट झाले. यातील राजपुरोहित माफीचा साक्षीदार बनला. त्यामुळे त्याची गुन्ह्यातून मुक्तता झाली. परंतु अन्य दोघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली. मग त्यांनी राष्ट्रपतींकडे दयाचा अर्ज दाखल केला. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरीत करण्यात आली.

आता कोणाची झाली मुक्तता

हा खटला सुरु असताना नारायण चेताराम चौधरी या आरोपीचे वय 20 ते 22 असल्याचे नोंदवण्यात आले होते. नारायण चौधरी याने आपला दयेचा अर्ज मागे घेत नवा दावा केला. त्याने गुन्हा घडला त्यावेळी आपण अल्पवयीन होतो, असं सांगत एक पुनर्विचार याचिका दाखल केली.

तीन वर्षांपूर्वी चौकशीचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी सत्र न्यायालयाला चौधरी याच्या दाव्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने त्यांच्या शाळेतील जन्‍मनोंदीचा पुरावे तपासले. त्यानंतर सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, के.एम जोसेफ आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने नारायण चौधरी याचा खुनाच्‍या गुन्‍ह्याच्या वेळी अल्‍पवयीन असल्‍याचा दावा मान्य करून त्याची कारागृहात तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.