AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HSC Result | शिक्षकांच्या या भूमिकेमुळे बारावीचा निकाल लांबणार

HSC Result : बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता. या विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेतील मुख्य नियामकांची बैठक बहिष्कारामुळे बुधवारी झाली नाही. त्यानंतर गुरुवारी हिंदी विषयाच्या मुख्य नियामकांची बैठक झाली नाही.

HSC Result | शिक्षकांच्या या भूमिकेमुळे बारावीचा निकाल लांबणार
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 24, 2024 | 8:53 AM
Share

प्रदीप कापसे, पुणे, दि. 24 फेब्रुवारी 2024 | बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत गुंतले आहे. परंतु बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षक संघटनेने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांच्या बहिष्कारामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण असणारी मुख्य नियामकांची बैठक झाली नाही. यामुळे यंदा बारावीचा निकाल जाहीर होण्यास उशीर होणार आहे.

बैठकांना बहिष्कार

बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता. या विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेतील मुख्य नियामकांची बैठक बहिष्कारामुळे बुधवारी झाली नाही. त्यानंतर गुरुवारी हिंदी विषयाच्या मुख्य नियामकांची बैठक झाली नाही. शुक्रवारी तोच प्रकार पुन्हा घडला. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या वारंवार आंदोलनकरूनही मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन केले जात आहे.

काय आहेत मागण्या

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांची सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत, यासह इतर मागण्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून आंदोलन केले जात आहे. तसेच शासन पातळीवर पाठपुरावा केला जात आहे. परंतु या मागण्या मान्य न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे.

लेखी परीक्षेसाठी सहकार्य

बहिष्कार आंदोलनामुळे पेपर तापसणीच्या ही बैठक झालेली नाही. विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा कुठलाही प्रकार नाही.तोंडी परीक्षा तसेच लेखी परीक्षेसाठी आम्ही सहकार्य करत आहोत. शासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. अशी भूमिका प्राध्यापकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मागण्या लवकर मान्य झाल्या नाही तर साहजिकच पेपर तपासण्यास उशीर होईल व त्याचा परिणाम निकालावर होऊन निकाल सुद्धा उशिराने लागतील. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल त्याला शासन जबाबदार राहील, असा इशारा सुद्धा प्राध्यापकांनी दिला आहे. दरम्यान शासकीय पातळीवर प्राध्यपकांशी अजून कोणतीही चर्चा सुरु झालेली नाही.

हे ही वाचा

पुस्तके समोर ठेऊन लिहा दहावी- बारावीचा पेपर, आता ‘ओपन बुक टेस्ट’

Follow Us
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार