AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते शिरोळचे त्या पुण्याच्या; वय वर्षे ७५-७०, मनं जुळली नि एकत्र आले

ज्येष्ठ नागरिक म्हणून जीवन जगत असताना अशी काही वेळ येईल, याची त्यांनी कधी कल्पना केली नव्हती. पण, आता ते सुखी आहेत. त्यांच्या आनंदात भर पडली आहे. आनंदी जीवन जगण्याचा मंत्र त्यांनी स्वीकारला आहे.

ते शिरोळचे त्या पुण्याच्या; वय वर्षे ७५-७०, मनं जुळली नि एकत्र आले
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Feb 26, 2023 | 11:38 AM
Share

कोल्हापूर : केव्हा कुणाचं मन कुणासोबत जुळेल, याचा काही नेम नाही. बाबूराव आणि अनुसया यांचेही तसेच झाले. बाबूराव हे शिरोळचे. पत्नी साथ सोडून देल्यानंतर त्यांनी वृद्धाश्रमाची वाट धरली. अनुसया या पुण्याच्या त्यांचे पती गेले. त्यानंतर त्याही एकाकी होत्या. मनात दुःख होतं. त्यांनीही वृद्धाक्षमाचा मार्ग पत्करला. वृद्धाश्रमात राहत असताना दोघांचीही मनं जुळून आली. पण, हिंमत होत नव्हती. शेवटी मनं मोठी केली. दोघांनीही विचार करून निर्णय घेतला. त्यांना साथ मिळाली. त्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकलं. ज्येष्ठ नागरिक म्हणून जीवन जगत असताना अशी काही वेळ येईल, याची त्यांनी कधी कल्पना केली नव्हती. पण, आता ते सुखी आहेत. त्यांच्या आनंदात भर पडली आहे. आनंदी जीवन जगण्याचा मंत्र त्यांनी स्वीकारला आहे.

दोघेही राहत होते वृद्धाश्रमात

शिरोळ येथील जानकी वृद्धाश्रमातील अशाच दोन समदुःखी वृध्दांनी वयाच्या सत्तरीत विवाह बंधनात अडकले आहेत. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वृध्दाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून धुमधडाक्यात लग्न लावून दिले. त्यामुळे या वेगळ्या लग्नाची खूपच चर्चा रंगली आहे. अनुसया शिंदे वय 70 मूळ रा.वाघोली,जि.पुणे अशी वृध्द नववधू तर वराचे बाबूराव पाटील वय 75, रा. शिवनाकवाडी, ता.शिरोळ नाव आहे. दोघेही दोन वर्षांपासून घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमात राहतात.

मन मोकळे करता करता जुळलं

दोघेही शरीराने स्वावलंबी असले तरी मानसिकदृष्ट्या खचलेल्या होते. दोघांचेही साथीदारांचे निधन झाले. त्यामुळे या समदुःखी वृध्दांनी एकमेकांच्या आयुष्यातील दुःखाचा पाढा वाचून मन मोकळे करता करता दोन्ही मने जुळली. लग्नाच्या बंधनातून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोघांचीही तयारी असल्याने व कायदेशीर सल्ला घेवून वृध्दाश्रमातच मांडव घालून दिला. ग्रामस्थ व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पद्धतीने थाटात लग्न लावून देत वृद्धांची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे या वृध्द जोडप्यांचा लग्न खूपच चर्चेची ठरली आहे.

Follow Us
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.