AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात आता नवीन ऑटो रिक्षा परमिट मिळणं होणार बंद? परिवहन विभागानं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे मागितली परवानगी

2020पूर्वी वाहन नोंदणीतून मिळणारा महसूल सर्वाधिक असायचा. परंतु, वर्षभरात नोंदणी सातत्याने कमी होत आहे, असे पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अधिकाऱ्याने सांगितले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 1. 30 लाख आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यातील वाहन नोंदणीत घट झाली आहे.

राज्यात आता नवीन ऑटो रिक्षा परमिट मिळणं होणार बंद? परिवहन विभागानं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे मागितली परवानगी
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: May 30, 2022 | 7:30 AM
Share

पुणे : राज्य परिवहन (ST) विभागाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे (MoRTH) प्रस्ताव पाठवला असून राज्यात नवीन ऑटो रिक्षा परमिट देणे थांबवण्याची परवानगी मागितली आहे. परिवहन विभागात आधीच मोठ्या प्रमाणात समस्या असताना आता ही परवानगी मागण्यात आली आहे. मंजुरी मिळाल्यावर, नवीन परमिट बंद केले जातील. याचा अर्थ असा, की राज्यात नवीन ऑटो-रिक्षा खरेदी करण्याची परवानगी कोणालाही मिळणार नाही. याला कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहावे लागेल, असे राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे (Avinash Dhakne) यांनी सांगितले आहे. पुढील महिन्यापर्यंत मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याचे विभागातील सूत्रांनी सांगितले. राज्यात सुमारे 7.5 लाख ऑटोरिक्षा आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 1. 30 लाख आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यातील वाहन नोंदणीत घट झाली आहे.

‘सरकारने प्रयत्न करायला हवेत’

राज्यात 2017पासून ओपन परमिट प्रणाली बंद करण्याची मागणी ऑटोरिक्षा संघटना करत आहेत. पुण्यात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात ऑटोची संख्या आहे. अशावेळी अनेक ऑटो चालकांचा व्यवसाय चांगला राहिला नाही. आम्ही परमिट बंद करण्याची मागणी करत आहोत आणि राज्य सरकारने त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे पुण्यातील सर्वात मोठी ऑटोरिक्षा युनियन असलेल्या रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार म्हणाले.

व्यवसायावर होत आहे परिणाम

2020पूर्वी वाहन नोंदणीतून मिळणारा महसूल सर्वाधिक असायचा. परंतु, वर्षभरात नोंदणी सातत्याने कमी होत आहे, असे पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अधिकाऱ्याने सांगितले. दोन-तीन वर्षांपूर्वी, मी दररोज 18-20 फेऱ्या करायचो आणि चांगल्या दिवशी सहज 1,500 रुपये किंवा त्याहून अधिक कमाई होत असे. आजकाल, दररोजची कमाई 500 रुपये आहे आणि दररोजच्या फेऱ्या चार-पाचवर घसरल्या आहेत, असे एका चालकाने सांगितले. एकीकडे इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्य ऑटोरिक्षा चालकालाही हे दर परवडत नाहीत. अनेकवेळा रिकाम्याच फेऱ्याही चालकांना प्रवासी मिळतील या आशेने माराव्या लागतात. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे या ऑटोचालकांचे म्हणणे आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत