AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

द केरळ स्टोरीवरुन वाद सुरु असताना धक्कादायक माहिती, राज्यातून आखाती देशात गेलेल्या हजारो महिला गायब?

the kerala story issue : देशात केरळ स्टोरीवरुन चर्चा सुरु असताना नवीन माहिती पुढे आली आहे. राज्यभरातून आखाती देशांमध्ये गेलेल्या हजारो मुली अन् महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचा कुटुंबियांशी संपर्क होत नाही.

द केरळ स्टोरीवरुन वाद सुरु असताना धक्कादायक माहिती, राज्यातून आखाती देशात गेलेल्या हजारो महिला गायब?
rupali chakankar
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 17, 2023 | 5:44 PM
Share

पुणे : देशात द केरळ स्टोरीवरुन वाद सुरु आहे. काही जणांकडून या चित्रपटाच्या कथेचे समर्थन केले जात आहे तर काही जणांकडून विरोध. एककडे काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घातली तर काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. या सर्व प्रकारात चित्रपटाची कामाई जोरात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातून आखाती देशांमध्ये महिलांची तस्करी होत असल्याचा दावा. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड भागातील 82 कुटुंबामधील महिला परदेशी गेल्या. तसेच राज्यातील 3,594 महिला आखाती देशांत गेल्या. त्यांचांशी आता संपर्क होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महिला आयोगाने घेतली सुनावणी

राज्यातील मुली आणि महिला गेल्या काही महिनांपासून मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होत आहे. यामध्ये 16 ते 35 वयोगटातील महिलांची संख्या जास्त आहे. आखाती देशांमध्ये महिलांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. महिलांच्या तपासासाठी महाराष्ट्र पोलीस, गृह विभाग करत असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी राज्य महिला आयोग कार्यालयात नुकतीच सुनावणी घेण्यात आली.

गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी

राज्यातील मिसिंग सेल, अनेक जिल्ह्यांतील भरोसा सेल हे केवळ कागदावरच आहेत ही वस्तुस्थिती आहे, असा आरोपही चाकणकर यांनी केला. 1 जानेवारी ते 31 मार्चची आकडेवारी पाहिली तर 3594 महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. ही बाब गंभीर आहे. कुणावर टीका करून प्रश्न सुटणार नाही. गृहमंत्र्यांनी यावर तातडीनं काम करावं, असे चाकणकर यांनी म्हटले आहे.

आमिष दाखवून पाठवतात

महिलांना आमिष दाखवून परदेशीत पाठवले जाते. काही दिवसांपूर्वी मुंबईतील साकीनाका भागातील दोन एजंट विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, ही मोठी यंत्रणा असल्याने याविरोधात ठोस कारवाई करणे आवश्‍यक आहे. गृह विभागाने पोलिसांना सहभागी करून समिती स्थापन करावी. त्याचा दर 15 दिवसांनी अहवाल आयोगाला सादर करावा, अशा सूचना केल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?